शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

धामकचे प्रकल्पग्रस्त भूखंडापासून वंचित

By admin | Updated: April 23, 2016 00:12 IST

तब्बल १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही धामक येथील प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असून ....

प्रतीक्षा व्यर्थ : अन्यायग्रस्तांनी धरली उपोषणाची कासमनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरतब्बल १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही धामक येथील प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असून त्यासाठी प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सन २००२ मध्ये धामक मधील अर्ध्यागावाचा पुनर्वसनात समावेश करण्यात आला व त्यासाठी ५३ एकर जमीन संपादीत करण्यात आली व त्यामध्ये ४३ प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप करून ताबा पावती सुद्धा देण्यात आली परंतु इतर प्रकल्पग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे भुखंड मिळण्यासाठी ताटकळत रहावे लागत आहे. धामक गावात ५५१ कुटूंब वास्तव्यास असून त्यापैकी २१५ कुटुंबाचा पुनर्वसनात समावेश झाला आहे व उर्वरीत गावाचा पुनर्वसनात समावे करून धामक ‘मॉडेल गाव’ बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला. परंतू अद्यापपर्यंत संपूर्ण धामक गावाचे एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात शासन व प्रशासनाला अपयश आले आहे व त्याला कारणही तसेच आहे. बहुतांश प्रकल्पग्रस्तांची शेतजमीन नवीन पुनर्वसन परिसरात आहे त्यामुळे नवीन गावाठाणमध्ये भुखंडाचे वाटप व्हावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे तर काही प्रकल्पग्रस्तांनी बेलोरा गावठाण नजीक भुखंडाची मागणी केली आहे तर काही ठराविक प्रकल्पग्रस्तांनी येवती गावठाणला पसंती दर्शविली आहे. परंतु ज्या ठिकाणी बहुतांश प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. त्याच ठिकाणी भुखंडाचे वाटप व्हावे ही रास्त मागणी आहे व त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी ३-११-२०१५ व १५-२-२०१६ तसेच २२-२-२०१६ ला वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्यानंतर प्रशासनाने धामक येथील तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देवून (बचत भवन, अमरावती) येथे प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप करण्याचे ठरले. परंतू काही कळण्याअगोदरच या भूखंड वाटपाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे संयमाचा बांध तुटल्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी शासनाने कोट्यवधी खर्चून पुनर्वसन स्थापित केले. त्याच ठिकाणी भुखंड मिळण्यासाठी अर्ज केला आहे जर तात्काळ भुखंडाचे वाटप न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.