शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

धामकचे प्रकल्पग्रस्त भूखंडापासून वंचित

By admin | Updated: April 23, 2016 00:12 IST

तब्बल १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही धामक येथील प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असून ....

प्रतीक्षा व्यर्थ : अन्यायग्रस्तांनी धरली उपोषणाची कासमनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरतब्बल १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही धामक येथील प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असून त्यासाठी प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सन २००२ मध्ये धामक मधील अर्ध्यागावाचा पुनर्वसनात समावेश करण्यात आला व त्यासाठी ५३ एकर जमीन संपादीत करण्यात आली व त्यामध्ये ४३ प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप करून ताबा पावती सुद्धा देण्यात आली परंतु इतर प्रकल्पग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे भुखंड मिळण्यासाठी ताटकळत रहावे लागत आहे. धामक गावात ५५१ कुटूंब वास्तव्यास असून त्यापैकी २१५ कुटुंबाचा पुनर्वसनात समावेश झाला आहे व उर्वरीत गावाचा पुनर्वसनात समावे करून धामक ‘मॉडेल गाव’ बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला. परंतू अद्यापपर्यंत संपूर्ण धामक गावाचे एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात शासन व प्रशासनाला अपयश आले आहे व त्याला कारणही तसेच आहे. बहुतांश प्रकल्पग्रस्तांची शेतजमीन नवीन पुनर्वसन परिसरात आहे त्यामुळे नवीन गावाठाणमध्ये भुखंडाचे वाटप व्हावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे तर काही प्रकल्पग्रस्तांनी बेलोरा गावठाण नजीक भुखंडाची मागणी केली आहे तर काही ठराविक प्रकल्पग्रस्तांनी येवती गावठाणला पसंती दर्शविली आहे. परंतु ज्या ठिकाणी बहुतांश प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. त्याच ठिकाणी भुखंडाचे वाटप व्हावे ही रास्त मागणी आहे व त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी ३-११-२०१५ व १५-२-२०१६ तसेच २२-२-२०१६ ला वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्यानंतर प्रशासनाने धामक येथील तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देवून (बचत भवन, अमरावती) येथे प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप करण्याचे ठरले. परंतू काही कळण्याअगोदरच या भूखंड वाटपाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे संयमाचा बांध तुटल्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी शासनाने कोट्यवधी खर्चून पुनर्वसन स्थापित केले. त्याच ठिकाणी भुखंड मिळण्यासाठी अर्ज केला आहे जर तात्काळ भुखंडाचे वाटप न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.