शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

३६ हजार शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: November 10, 2015 00:29 IST

बलिप्रदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रदेलाच दिवाळीची उपमा आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़

सोयाबीन गेले : सावकारांनीही मदत नाकारलीधामणगाव रेल्वे : बलिप्रदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रदेलाच दिवाळीची उपमा आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़ पूर्व भागात केवळ एकरी एक पोतं सोयाबीन घरी आल्याने मागील वर्षाचे सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले पीककर्ज परत करण्याची अवस्था शेतकऱ्याकडे नसल्यामुळे या सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़जिल्ह्यात सर्वाधिक फटका यंदा खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ अल्प पावसामुळे दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीन घेत असत. यंदा तर शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे़ हार्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर एका एकरात केवळ एक पोतं सोयाबीन निघाले. त्यामुळे हार्वेस्टरचा खर्च देणेही परवडनासे झाले असल्याची माहिती दिघी येथील अनुभवी शेतकरी अरूण महल्ले यांनी दिली़ एका एकराकरिता तब्बल १५ ते २० हजार खर्च सोयाबीनसाठी आला असताना एक किंवा दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर मागील वर्षाचे सावकरांचे कर्ज द्यावे की बँकेची परतफेड करावी किंवा दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न महल्ले यांनी या भागातील शेतकऱ्यांच्यावतीने उपस्थित केला आहे़ चणा, गहू बियाणे मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा अल्प पावसामुळे घरात सोयाबीन आले नाही़ खरीप हंगाम हातातून गेला. आता रबी हंगामाकरिता शेतात प्रथम तणनाशक मारणे गरजेचे आहे़ तद्नंतर व्ही-पास व रोटावेटर फिरविण्याचा खर्च अधिक येतो़ एकरी ३० किलो हरभरा २ हजार रूपये, पेरणी दीड हजार, शेतीची मशागत २ हजार व खताचा खर्च असा ६ हजार रूपये एकरी खर्च येत असून गहू पिकासाठी यापेक्षा जास्त खर्च येतो. खरीप हंगामात हातात काहीच न आल्यामुळे गहू व चणा बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे़जुन्याच कपड्यावर करणार दिवाळी साजरी घरी दोन एकर शेती केवळ तीन पोते सोयाबीन घरी आले़ या पिकाने पूर्ण दगा दिला आहे़ दरवर्षी दिवाळीच्या आठ दिवसांपूर्वी मुलांसाठी कपडे खरेदी करण्याची घाई होती़ मोठा आनंद साजरा करण्यात येत होता़ परंतु यंदा निर्सगाच्या चक्रव्यूहामुळे हातात पीक आले नाही घरी फराळाचे सोडा साधा दिवाळीसाठी किराणा आणण्याची सोय नाही, दिवा कसा पेटवायचा याची चिंता आहे़ त्यामुळे यंदा काळजाच्या तुकड्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर साजरी करण्याची वेळ आली आहे़