शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

३६ हजार शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: November 10, 2015 00:29 IST

बलिप्रदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रदेलाच दिवाळीची उपमा आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़

सोयाबीन गेले : सावकारांनीही मदत नाकारलीधामणगाव रेल्वे : बलिप्रदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रदेलाच दिवाळीची उपमा आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील ३६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़ पूर्व भागात केवळ एकरी एक पोतं सोयाबीन घरी आल्याने मागील वर्षाचे सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले पीककर्ज परत करण्याची अवस्था शेतकऱ्याकडे नसल्यामुळे या सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़जिल्ह्यात सर्वाधिक फटका यंदा खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ अल्प पावसामुळे दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीन घेत असत. यंदा तर शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे़ हार्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर एका एकरात केवळ एक पोतं सोयाबीन निघाले. त्यामुळे हार्वेस्टरचा खर्च देणेही परवडनासे झाले असल्याची माहिती दिघी येथील अनुभवी शेतकरी अरूण महल्ले यांनी दिली़ एका एकराकरिता तब्बल १५ ते २० हजार खर्च सोयाबीनसाठी आला असताना एक किंवा दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर मागील वर्षाचे सावकरांचे कर्ज द्यावे की बँकेची परतफेड करावी किंवा दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न महल्ले यांनी या भागातील शेतकऱ्यांच्यावतीने उपस्थित केला आहे़ चणा, गहू बियाणे मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा अल्प पावसामुळे घरात सोयाबीन आले नाही़ खरीप हंगाम हातातून गेला. आता रबी हंगामाकरिता शेतात प्रथम तणनाशक मारणे गरजेचे आहे़ तद्नंतर व्ही-पास व रोटावेटर फिरविण्याचा खर्च अधिक येतो़ एकरी ३० किलो हरभरा २ हजार रूपये, पेरणी दीड हजार, शेतीची मशागत २ हजार व खताचा खर्च असा ६ हजार रूपये एकरी खर्च येत असून गहू पिकासाठी यापेक्षा जास्त खर्च येतो. खरीप हंगामात हातात काहीच न आल्यामुळे गहू व चणा बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे़जुन्याच कपड्यावर करणार दिवाळी साजरी घरी दोन एकर शेती केवळ तीन पोते सोयाबीन घरी आले़ या पिकाने पूर्ण दगा दिला आहे़ दरवर्षी दिवाळीच्या आठ दिवसांपूर्वी मुलांसाठी कपडे खरेदी करण्याची घाई होती़ मोठा आनंद साजरा करण्यात येत होता़ परंतु यंदा निर्सगाच्या चक्रव्यूहामुळे हातात पीक आले नाही घरी फराळाचे सोडा साधा दिवाळीसाठी किराणा आणण्याची सोय नाही, दिवा कसा पेटवायचा याची चिंता आहे़ त्यामुळे यंदा काळजाच्या तुकड्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर साजरी करण्याची वेळ आली आहे़