शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

धारणी, दर्यापूर, अंजनगावात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:05 IST

चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने ग्रामस्थांची पार दैनावस्था झाली आहे.

जनजीवन विस्कळीत : चार तालुक्यांतील सहा गावांना फटका अमरावती : चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने ग्रामस्थांची पार दैनावस्था झाली आहे. १४ तालुक्यापैकी धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यात धारणीत सर्वाधिक १५७.४ मिमि पाऊस पडला.या अतिवृष्टीने हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. दर्यापूर व अंजनगाव सुर्जी या दोन तालुक्यात प्रत्येकी ७१ मिमि पावसाची नोंद झाली.मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३८.२ मिमि पाऊस पडला. मागील ७२ तासांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच मोठ्या नदी-उपनदी आणि नाल्यांना पूर आल्याने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत ५४ टक्के पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे.जिल्ह्यात १ जून ते १२ जुलैदरम्यान २५३ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४०.१ मिमी अर्थात १७३.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तिवसा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ७५.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात ८१४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात १२ जुलैपर्यंत ४४०.१ मिमी पाऊस पडला.