शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

भाविकांना टाळमृदंगाच्या निनादाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

अमरावती : कोरोनाकाळात भाविकांची गर्दी व त्यातून पाहायला लावणारा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले गेले. श्रावणात भक्तीचा ...

अमरावती : कोरोनाकाळात भाविकांची गर्दी व त्यातून पाहायला लावणारा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले गेले. श्रावणात भक्तीचा महापूर येत असतो. मात्र, यंदाही श्रावणातील भाविकांच्या उत्साहावर पाणी पडणार आहे. मंदिर अद्याप लॉकच असल्यामुळे हरिपाठ, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी मंदिरातील टाळ-मृदंगाचा नीनादही लॉकच आहे. भक्तिमय सुरकुत्या भाविकांना आस लागलेली असून, हरिनामाचा जागर कधी सुरू होणार याचा वेध लागला आहे.

राज्यासह जिल्ह्यात सुमारे दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिल्या लाटेतून सावरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लाटेने थैमान घातले. त्यामुळे सामाजिक धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले. जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंदच आहेत. पहिली लाट ओसल्यानंतर सर्व क्षेत्र खुले झाल्यावरही गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे लॉकच आहेत. जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा बरोबरच विशेष धार्मिक पार्श्वभूमी आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रसिद्ध व जागृत देवस्थाने आहेत. या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी नेहमीच रेलचेल असते. मात्र, कोरोनामुळे शहरासह ग्रामीण भागातील मंदिरे अनलॉकचा काही काळ वगळता वर्षभर बंदच आहेत. मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रमांनाही निर्बंध लावण्यात आले आहेत. श्रावण महिन्याला अजून अवधी आहे. मात्र, या महिन्यात धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. अखंड हरिनाम सप्ताह कोरोनामुळे होत नाहीत. मंदिरात सकाळी काकड आरती, पूजा तर सायंकाळी हरिपाठ कीर्तन भजन होत असते. त्यांच्या सोबतीला टाळ मृदंग, पखवाज यांचा नाद घुमतो. कोरोना संकटामुळे सर्व मंदिर व धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने टाळ-मृदंगाचा निनाद लॉकडाऊनच आहे. फारशा कौटुंबिक जबाबदाऱ्या नसल्यामुळे बहुतेक ज्येष्ठ मंडळी मंदिरामधील भजन कीर्तनात सहभागी होतात. कोरोनामध्ये कार्यक्रम होत नसल्याने ज्येष्ठ मंडळीचे व्यक्तिस्वातंत्र्याचे व्यासपीठ दुरावल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

पुजारी वर्गाचे अर्थकारण ठप्प

सर्व मंदिरांमध्ये देखभाल व पूजाअर्चा करण्याचे काम पुजारी करत असतात. प्रत्येक मंदिराच्या पुजाऱ्याच्या एकापेक्षा जास्त संख्या असल्याने प्रत्येक पुजाऱ्याला मंदिर समितीकडून मानधनतेचा इशारा दिला जातो. कोरोनामुळे वर्षभर मंदिर बंद असल्याने भाविकांच्या पूजा, होमहवनला अभिषेक दर्शनाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंदमुळे उत्पन्नाचे स्रोत लॉक असल्याने पुजारी वर्गाचे अर्थकारण ठप्प झाले आहे.