शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी तालुक्यात पथदर्शी प्रकल्प उभारणार

By admin | Updated: July 28, 2015 00:37 IST

रेशीम उद्योग हा शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना व बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर करून खात्रीलायक मिळकत देणारा रेशीम उद्योग आहे.

पालकमंत्री : कृषी विभागाद्वारे ५० एकरांमध्ये तुतीची लागवड अमरावती : रेशीम उद्योग हा शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना व बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर करून खात्रीलायक मिळकत देणारा रेशीम उद्योग आहे. जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासकीय मालकीच्या ई-क्लास जमिनीवर पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रवण्ीा पोटे यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली रेशीम उद्योग उभारण्यासाठी महत्त्वाच्या बांबीसंदर्भात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, रेशीम विकास अधिकारी आर. बी. जोगदंड, तांत्रिक सहायक व्ही. पी. पावसकर, अमरावती, अचलपूर, मोर्शी, अंजनगावसुर्जी तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार व नायब तहसीलदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, रेशीम उद्योग हा चांगले उत्पन्न मिळवून देणारा उद्योग आहे. रेशीम उद्योग उभारण्यासाठी प्रामुख्याने तुती झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी अनुकूल वातावरण व जागेच्या उपलब्धतेनुसार तालुक्याच्या ठिकाणी शासकीय मालकीच्या ई- क्लास जमीनीवर पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येणार. वर्षाकाठी जास्तीत जास्त मिळकत मिळवून देणारा तुती व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आपल्या जमिनीचा तुती या पिकाच्या लागवडीसाठी उपयोग करावा, रेशीम शेती करण्यासाठी शासनाद्वारे सर्वच स्तरावर आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री पोटे यांनी सांगितले. प्रास्ताविकात जोगदंड यांनी सांगितले की, रेशीम उद्योग चालू करण्यासाठी सुमारे १ लाख ७५ हजार रुपये लागतात. ४० बाय २० चे आंतर शेड उभारण्यासाठी ८७ हजार ५०० रुपए एवढा खर्च येतो. प्रकल्प उभारण्यासाठी रेशीम संचालनालयाव्दारे अनुदानसुध्दा पुरविण्यात येते. तुतीच्या लागवडीसाठी रेशीम विभागाद्वारे उच्चप्रतीचे तुतीचे बेणे व तयार रोपे शेतकऱ्यांना पुरविण्यात येतात. एकरी तीन क्विंटल उत्पादनात एक ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळविण्यास मदत होते. बालअळींच्या संगोपनातून निर्माण होणाऱ्या कोषाला प्रतिकीलो १८० रुपये भाव मिळतो. आंतर शेडचे पीक असल्यामुळे निसर्गाद्वारे हानी होऊ शकत नाही. अळ्यांव्दारे खाऊन झालेला पाला गुरांना दुग्धजन्य चारा म्हणून उपयोगात आणणे शक्य होते. तुतीची लागवड केल्यावर साडेतीन महिन्यांत पीक तयार होते. तुतीच्या झाडाचे वय सुमारे १५ वर्षे आहे. शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग केल्यास नक्कीच त्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेशीम उद्योगाव्दारे शेतकऱ्यांना चांगला लाभ होऊ शकतो, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, रेशीम शेतीचे महत्त्त्व लक्षात घेता रेशीम व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतीविषयी माहिती देऊन सदर उद्योग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. यामुळे शेतकऱ्यांना शास्वतीचे पीक घेणे शक्य होईल. त्यामुळे त्यांचे उत्पन्नदेखील वाढेल. परिणामी शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. रेशीम उद्योग उभारण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांना शासकीय जमीनी हस्तांतरीत करण्यात येईल. आदर्श प्रोजेक्ट तयार करण्यासाठी अचलपूर तालुक्यातील पायविहीर येथे १० एकर जमिनीवर तुतीची लागवड करण्यात येईल. अमरावती विभागात रेशीम उद्योग उभारण्यासाठी बचत गटांना सुध्दा प्रवृत्त करण्यात येईल. नांदगांव खंडेश्वर, अंजनगांव सुर्जी, तिवसा, अचलपूरसह जिल्ह्यातील ई-क्लास शासकीय जमिनीवर रेशीम उद्योग उभारण्यात येईल. यावर्षी कृषी विभागाद्वारे ५० एकरामध्ये तुतीची लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. शासनस्तरावर रेशीम उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)