शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिद्धपूर तिर्थक्षेत्राचा पर्यटनस्थळांचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

अखिल महानुभाव परिषदेची मागणी ! मोर्शी : महानुभावपंथांची काशी असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू ...

अखिल महानुभाव परिषदेची मागणी !

मोर्शी : महानुभावपंथांची काशी असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू श्री गोविंदप्रभू यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यासाठी थीम पार्क, तसेच श्री महानुभाव पंथांशी संबंधित विविध स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाची शक्यता आहे. त्या लक्षात घेऊनच प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देऊन रिद्धपूर तीर्थक्षेत्रात विविध ठिकाणी विकास आराखड्यातून कामे होत आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळानेही यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्या पाहिजेत. रिद्धपूर येथे विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे उपक्रम राबवावेत. तेथील विविध स्थळांचा विकास साधताना तेथील तलावाचेही सौंदर्यीकरण करावे. आराखड्यातील निधीबरोबरच पर्यटन निधीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी केली आहे.

रिद्धपूर तीर्थक्षेत्रकारिता भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे, रुपेश वाळके, नितीन लुंगे,सुधाकर कोठीकर, प्रदीप टेकाडे, विनोद लुंगे, आशिष वानखडे, सुरेश मडघे, विनोद कोहळे, बाबुराव कडू, गोपाल लुंगे, सुनील शेळके, राजेंद्र देशमुख यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.

महानुभावपंथाची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेसाठीचे महात्म्य स्थळ असलेल्या श्री रिद्धपूर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा राबविण्यात यावा, रिद्धपूर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. वरूड- मोर्शी तालुक्यातील महानुभावपंथांच्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा, या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करावा, परिसरातील तळे, नैसर्गिक उद्याने, मोकळ्या जागांचा विकास केल्यास पर्यटकांसाठी नानाविध आकर्षण स्थळे निर्माण होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे मत अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी मांडले.