शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

रिद्धपूर तिर्थक्षेत्राचा पर्यटनस्थळांचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

अखिल महानुभाव परिषदेची मागणी ! मोर्शी : महानुभावपंथांची काशी असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू ...

अखिल महानुभाव परिषदेची मागणी !

मोर्शी : महानुभावपंथांची काशी असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू श्री गोविंदप्रभू यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यासाठी थीम पार्क, तसेच श्री महानुभाव पंथांशी संबंधित विविध स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाची शक्यता आहे. त्या लक्षात घेऊनच प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देऊन रिद्धपूर तीर्थक्षेत्रात विविध ठिकाणी विकास आराखड्यातून कामे होत आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळानेही यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्या पाहिजेत. रिद्धपूर येथे विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे उपक्रम राबवावेत. तेथील विविध स्थळांचा विकास साधताना तेथील तलावाचेही सौंदर्यीकरण करावे. आराखड्यातील निधीबरोबरच पर्यटन निधीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी केली आहे.

रिद्धपूर तीर्थक्षेत्रकारिता भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे, रुपेश वाळके, नितीन लुंगे,सुधाकर कोठीकर, प्रदीप टेकाडे, विनोद लुंगे, आशिष वानखडे, सुरेश मडघे, विनोद कोहळे, बाबुराव कडू, गोपाल लुंगे, सुनील शेळके, राजेंद्र देशमुख यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.

महानुभावपंथाची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेसाठीचे महात्म्य स्थळ असलेल्या श्री रिद्धपूर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा राबविण्यात यावा, रिद्धपूर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. वरूड- मोर्शी तालुक्यातील महानुभावपंथांच्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा, या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करावा, परिसरातील तळे, नैसर्गिक उद्याने, मोकळ्या जागांचा विकास केल्यास पर्यटकांसाठी नानाविध आकर्षण स्थळे निर्माण होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे मत अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी मांडले.