शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

रिद्धपूर तिर्थक्षेत्राचा पर्यटनस्थळांचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

अखिल महानुभाव परिषदेची मागणी ! मोर्शी : महानुभावपंथांची काशी असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू ...

अखिल महानुभाव परिषदेची मागणी !

मोर्शी : महानुभावपंथांची काशी असलेले श्रीक्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू श्री गोविंदप्रभू यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यासाठी थीम पार्क, तसेच श्री महानुभाव पंथांशी संबंधित विविध स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाची शक्यता आहे. त्या लक्षात घेऊनच प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देऊन रिद्धपूर तीर्थक्षेत्रात विविध ठिकाणी विकास आराखड्यातून कामे होत आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळानेही यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्या पाहिजेत. रिद्धपूर येथे विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे उपक्रम राबवावेत. तेथील विविध स्थळांचा विकास साधताना तेथील तलावाचेही सौंदर्यीकरण करावे. आराखड्यातील निधीबरोबरच पर्यटन निधीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी केली आहे.

रिद्धपूर तीर्थक्षेत्रकारिता भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे, रुपेश वाळके, नितीन लुंगे,सुधाकर कोठीकर, प्रदीप टेकाडे, विनोद लुंगे, आशिष वानखडे, सुरेश मडघे, विनोद कोहळे, बाबुराव कडू, गोपाल लुंगे, सुनील शेळके, राजेंद्र देशमुख यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे.

महानुभावपंथाची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेसाठीचे महात्म्य स्थळ असलेल्या श्री रिद्धपूर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा राबविण्यात यावा, रिद्धपूर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. वरूड- मोर्शी तालुक्यातील महानुभावपंथांच्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा, या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करावा, परिसरातील तळे, नैसर्गिक उद्याने, मोकळ्या जागांचा विकास केल्यास पर्यटकांसाठी नानाविध आकर्षण स्थळे निर्माण होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे मत अखिल महानुभाव परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी मांडले.