शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

१५ दिवसांत डेंग्यूचे पुन्हा पाच रुग्ण दाखल

By admin | Updated: August 5, 2014 23:13 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात ३ आॅगस्ट पर्यंतच्या पंधरा दिवसांत पाच रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या जनजागृती मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून येते. डेंग्यूचा वाढता

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात ३ आॅगस्ट पर्यंतच्या पंधरा दिवसांत पाच रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या जनजागृती मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून येते. डेंग्यूचा वाढता प्रभाव आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. काही वर्षांपासून जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा वाढता प्रभाव पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षांत डेंग्यू सदृश्य आजारांने १० ते १५ नागरिकांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस ही संख्या वाढती आहे. ताप आजाराचे रुग्ण तिन्ही ऋतुमध्ये पाहायला मिळत आहेत. डासांपासून होणाऱ्या आजाराचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता नागरिकांनीही आरोग्य विषयक सतर्कता बाळगणे अत्यावश्यक झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालतून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ३० टक्के वाढ झाल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे डास निर्मुलनासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. याकरिता प्रत्येक शहर व ग्रामीण भागात डास निर्मुलनसाठी जनजागृती केली जात आहे. मात्र डासापासून होणारी रोगराई फोफावत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील वाढते शहरीकरण, पाणी दूषित होण्याचे प्रमाण या आजारात आणखी भर टाकत आहेत. डेंग्यू आजार डासांमुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. एडीस डासाच्या मादीमुळे डेंग्यू आजारांची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यामध्ये अंडी देऊन आपली संख्या वाढवितो. तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर लासर पुरळ, तीव्र पोटदुखी, गंभीर रुग्णास रक्तस्त्राव, असे डेंग्यू आजारांची लक्षणे आहे. डेंग्युच्या गंभीर रुग्णाचा प्लेटलेट कमी झाल्याने होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे आणि शॉकमुळे रुग्णाचा मृत्यूदेखील संभवतो. त्यामुळे डेंग्युचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे झाले आहे. १ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत इर्विन रुग्णालयात डेंग्यूचे १२ रुग्ण दाखल करण्यात आले. एक वर्षांत सुमारे १०० च्यावर डेंग्यू रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.