शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

साडेसहा कोटींच्या विकासकामांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 00:37 IST

जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीमधून १४ तालुक्यांतील विकासकामांसाठी मंजूर सुमारे ६.५० कोटींच्या कामांची प्रशासकीय कारवाई

जिल्हा परिषद : निधीतील कामे मार्गी लागण्याची आशा धुसर अमरावती: जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीमधून १४ तालुक्यांतील विकासकामांसाठी मंजूर सुमारे ६.५० कोटींच्या कामांची प्रशासकीय कारवाई शून्य असल्याने ऐन निवडणुकीच्या कालावधीतच याकामांचा बोजवारा उडण्याची चर्चा झेडपीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे याचा फटका ग्रामविकासाला बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हानिधीतून विकासकामांचे नियोजन केले आहे. यानुसार ६.५० कोटींच्या निधीतून विविध कामे मंजूर केली आहेत. मात्र, याकामांचा प्रस्ताव ६ जूनच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम, पंचायत आणि वित्त या तीन विभागांपैकी नेमका कोणी मांडला, असा प्रश्न सभेत बसपाचे जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी उपस्थित केला होता. याप्रश्नावर उपरोक्त तीन्ही विभागांनी मौन धरले होते. त्यामुळे हा ठराव आलाच कसा, याचे उत्तर सभागृहात सदस्यांना देण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे सभेत ठराव मांडला कुणी, हे माहित नसताना नेमका ठरावा पारित झाला तरी कसा, हे कोडे सुटले नाही. तरी देखील २५-१५ या लेखाशिर्षामध्ये (लोकपयोगी कामे) ६.५० कोटींची २०८ विविध कामे मंजूर करून प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. मात्र, प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित होताच जिल्हानिधीचे नियोजन कोलमडले असून प्रशासकीय मान्यता दिली असली तरी याची जबाबदारी घेण्यावरून प्रशासकीय यंत्रणेने हात वर केले आहेत. त्यामुळे कोटयवधी रूपयांच्या कामांचा प्रस्ताव सध्या प्रशासकीयस्तरावर बारगळा आहे. या प्रस्तावानुसार कामांच्या निविदा मागविणे, निविदा उघडणे, कार्यारंभ आदेश असे प्रशासकीय सोपस्कार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया करावी लागते. दुसरीकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असून त्यासाटी डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडयात आचारसंहिता लागू होऊ शकते. प्रशासकीय सोपस्कार आणि आचारसंहिता या दोन्ही बाजू लक्षात घेतल्यास सुमारे ६.५० कोटी रूपयांमधून लोकोपयोगी २५-१५ या लेखाशिर्षातील कामे एक ते दीड महिन्याच्या कालावधीत करणे अशक्य असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हानिधीतील विकासकामांचा बोजवारा उडण्याची शक्यता वाढली आहे. आता जिल्हा परिषदेचे सत्ताधारी याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आचारसंहितेपूर्वी विकासकामे मार्गी लागावीत, या अनुषंगाने निर्णय होतो किंवा कसे, याबाबत प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)