शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

सोयाबीन बीजोत्पादन पुरवठय़ाचा बोजवारा

By admin | Updated: May 27, 2014 00:23 IST

राज्याचे खरीप पेरणीचे नियोजन व अंमलबजावणीच्या दृष्टीने पेरणी व उत्पादने उद्दिष्ट महत्त्वाचे मानले जाते. नेमक्या याच बाबीकडे यंदा कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

सुरेश सवळे - चांदूरबाजार

राज्याचे खरीप पेरणीचे नियोजन व अंमलबजावणीच्या दृष्टीने पेरणी व उत्पादने उद्दिष्ट महत्त्वाचे मानले जाते. नेमक्या याच बाबीकडे यंदा कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या गदारोळात खरिपासाठीच्या योजना केंद्राच्या मंजुरीसाठी अडकून पडल्या आहेत. सोयाबीन बिजोत्पादन व पुरवठय़ाचा बोजवारा उडाल्यानंतर घरचेच बियाणे पेरण्याचा आग्रह वगळता उर्वरित सर्व आघाड्यावर कृषी विभाग निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे. परिणामी यंदा बियाण्याच्या काळाबाजाराच्या माध्यमातून बियाणे विक्रेते शेतकर्‍यांना चांगलेच नाडवणार आहे.

मागील खरिपात सोयाबीन पक्वतेच्या काळातच अधिक पाऊस पडल्याने अनेक राज्यांत बीजोत्पादनाला फटका बसला. बियाण्यांची उपलब्धता व गुणवत्ता या दोन्हीत घट झाली. परिणामी राज्यात यंदा कमी प्रमाणात बियाण्यांची उपलब्धता होणार आहे. येत्या खरिपात सुमारे ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज आहे. राज्यात सुमारे ५५ टक्के सोयाबीन क्षेत्रात नवीन बियाणे वापरले जाते. त्यानुसार यंदा सुमारे १४ लाख ६२ हजार टन बियाणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात खासगी व शासकीय कंपन्यांकडे एकूण ८ लाख ५९ हजार टन बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा मागणीच्या तुलनेत तब्बल सहा लाख टन नवीन बियाण्यांची तूट आहे.

राज्यात उपलब्ध असलेले सोयाबीनचे सर्व वाण हे सरळवाण आहेत. दरवर्षी नवीन बियाणे वापरण्याची आवश्यकता नसते. तीन वर्षांतून एकदा नवीन बियाणे वापरले तरी पुरेसे असते. संभाव्य बियाणे तुटवड्याच्या या पार्श्‍वभूमीवर यंदा शेतकर्‍यांनी नवीन बियाण्यांचा आग्रह न धरता स्वत: उत्पादित केलेले सोयाबीन वापरावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

दुसरीकडे राज्याचे खरीप नियोजन व अंमलबजावणीच्या दृष्टीने पेरणी व उत्पादने उद्दिष्ट महत्त्वाचे समजले जाते. नेमक्या याच बाबीकडे यंदा कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. खरीप नियोजनाच्या बैठकांबाबतही उदासीन अवस्था दिसून येत आहे. प्रत्यक्षात मे महिना संपत आला असतानाही अद्याप अनेक जिल्ह्यात नियोजनाच्या बैठका झाल्या नाहीत. या बैठका फक्त सोपस्कार म्हणून उरकण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांच्या हालचालीवरून दिसून येते. लोकसभा निवडणूक, आचारसंहिता, निवडणूक प्रक्रिया आणि पाठोपाठ सत्तापालट या सर्व गदारोळात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणार्‍या योजना व यंदा प्रस्तावित असलेल्या खरिपासाठीच्या बहुतेक योजना रखडल्या आहेत. एप्रिल व मे दोन्ही महिने त्या दृष्टीने गतिशून्य ठरले असून आता योजनेची मान्यता आणि पेरणी हंगामाची लगबग एकाच वेळी सुरू होण्याची शक्यता आहे.