शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

उद्दिष्ट्याच्या तुलनेत अर्ज कमी

By admin | Updated: March 18, 2016 00:19 IST

मागेल त्याला शेततळेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी ३१५९ इतका लक्ष्यांक देण्यात आला आहे.

थंड प्रतिसाद : मागेल त्याला शेततळे योजनेला तोकड्या अनुदानाचा फटकाअमरावती : मागेल त्याला शेततळेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी ३१५९ इतका लक्ष्यांक देण्यात आला आहे. त्यासाठी १८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांकरिता शासनाने ३,१५९ एवढे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये सर्वाधिक शेततळे भातकुली तालुक्यात ५१४ तर चिखलदरा तालुक्यात २० शेततळ्यांचे उद्दिष्ट्य आहे. त्यानंतर इतर तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी ३ हजार १५९ एवढा लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ १८६ अर्ज प्राप्त झाल्याचे, तर ३४० अर्जांचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याची माहिती आहे. राज्य शासनाने नुकतीच मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. मात्र यासाठी यापूर्वी आघाडी सरकारने शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी सुमारे ८२ हजार रूपयांचे अनुदान दिले होते. मात्र आताच भाजपा सरकारने शेततळे निर्मितीसाठी केवळ ५० हजारांचे अनुदान प्रत्येकी एका शेततळा करीता देण्याचे जाहीर केले आहे. मात्र एवढया अल्पशा कि मतीत शेततळे साकारणे अशक्य असल्याचे शेतकरी व जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्याला शेततळे निमिर्तीसाठी देण्यात आलेल्या लक्ष्यांकाच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून तोकड्या अनुदानामुळे अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे अर्ज संख्येवरून दिसून येते. त्यामुळे शेततळे अनुदानाचे रक्कमेत शासनाने वाढ करणे अपेक्षित आहे. त्याशिवाय प्रशासनला उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)असे आहेत निवडीचे निकष या योजनेसाठी किमान दीड एकर शेती असणारा शेतकरी पात्र आहे. दारिद्र्यरेषेखालील व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसाची अग्रक्रमाणे निवड होणार आहे. अर्ज प्राप्तीच्या ज्येष्ठता यादीनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांची पसंती व जमिनीच्या प्र्रकारानुसार शेततळे घेता येणार आहे. दुष्काळ निवारण उपायांतर्गत निधी या कामासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.आॅनलाईन अर्जाची डोकेदुखीशेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने नव्याने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे.याकरिता पहिल्यांदाच महा-ईसेवा केंद्रामार्फत अथवा आपले सरकार संकेतस्थळावरील प्रोफाईलवरुन लाभार्थ्यांनी मागणी अर्ज आॅनलाईन करावे. लागणार आहेत.मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यासाठी गावस्तरावर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध नसल्याने आर्थिक फटका सहन करून यासाठी चकरा माराव्या लागत आहेत.