शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

विद्यापीठाच्या मानांकनात घसरण; संशोधन कार्य माघारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST

------------------------------------------------------------------------------------------------------------- चार वर्षांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष, संशोधन, सामाजिक योगदान, बांधीलकी, नावीन्यपूर्ण उपक्रमात पिछाडी अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानांकनात ...

-------------------------------------------------------------------------------------------------------------

चार वर्षांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष, संशोधन, सामाजिक योगदान, बांधीलकी, नावीन्यपूर्ण उपक्रमात पिछाडी

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानांकनात गत चार वर्षात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. देशभरातील विद्यापीठाच्या मानांकनाचा अभ्यास करणारी स्किमॅगो जर्नल ॲण्ड कंट्री रँक या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळात संशोधन, सामाजिक योगदान, बांधीलकी, नावीन्यपूर्ण उपक्रम माघारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

स्किमॅगो जर्नल ॲण्ड कंट्री रँक या संस्थेने अमरावती विद्यापीठाच्या सर्वसाधारण मुद्द्यांवर तसेच विशिष्ट, नेमक्या व महत्त्वाच्या अशा संशोधन, सामाजिक योगदान, सामाजिक बांधीलकी, इनोव्हेशन अर्थात नावीन्यपूर्ण, नवीन पुढाकार व नवीन उपक्रम या चार निकषांवर आधारित मानांकनात वर्ष २०१६ ते २०२१ या कालावधी दरम्यान घसरण झाल्याचे विविध आकडेवारी देऊन प्रकाशित केले आहे.

यात स्कोपस या जगप्रसिद्ध अशा गोषवारा व प्रशस्तीपत्राच्या आधारे संशोधन व अन्य निकषांच्या आधारे जगातील व भारतातील विद्यापीठाचे मूल्यमापन करणाऱ्या संस्थेने संबंधित विद्यापीठांच्या संकेत स्थळावरून व त्या देशातील मानांकन करणाऱ्या संस्थांकडे उपलब्ध असलेल्या संबंधित विद्यापीठाच्या विविध मुद्द्यांशी निगडीत सांख्यिकी माहितीच्या आधारावर हा अहवाल जारी केला आहे. त्या आकडेवारीचा उपयोग स्किमॅगो या संस्थेने केला आहे.

——————

मानांकनावर एक नजर...

२०१७ मध्ये देशातील सार्वजनिक विद्यापीठांचे, स्वायत्त महाविद्यालय, अभिमत विद्यापीठांचे एकत्रित सर्वसाधारण मानांकन करण्यात आले. यात अमरावती विद्यापीठ ४२ व्या क्रमांकावर होते. आता हे मानांकन २०२१ मध्ये घसरून १२५ वर आले आहे. तर २०२१ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ६१ व्या स्थानावर, मराठवाडा विद्यापीठ ६४ व्या स्थानी, पुणे विद्यापीठ ४४ व्या स्थानावर, तर मुंबई विद्यापीठ ६० व्या स्थानावर असल्याचे स्पष्ट केले आहे.

०००००००००००००००००००००००००

विद्यापीठाच्या मानांकनाबाबत झालेल्या सर्वेक्षणाविषयी काहीही माहिती नाही. नेमके कशाच्या आधारे सर्वेक्षण झाले, हे कळले नाही; मात्र गत चार वर्षात विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात संशोधन, सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे.

- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ.