शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण ...

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण विभागाने जारी केला. ज्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करायचे आहेत. संबंधित गावात किमान महिनाभर आदीपासून एकही कोरोना बाधित नसावा, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे मार्गदर्शनात शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गावांनी कोरोना निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. यात कुणीही कुचराई करू नये, अशा सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत.

बॉक्स

समितीत यांचा समावेश

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच, सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच निमंत्रित सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी सदस्य, सचिव, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश असेल.

बॉक्स

नव्याने घेतलेला निर्णय

दोन दिवसापूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणेबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून बुधवारी पुन्हा नव्याने आठवी व बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यावेळी शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

बॉक्स

‘चला मुलांनो शाळेत चला‘ मोहीम

शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावले जावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बेंचमध्ये सहा फुटांचे अंतर. एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असावे तसेच चला मुलांनो शाळेत चला ही मोहीम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.