शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण ...

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण विभागाने जारी केला. ज्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करायचे आहेत. संबंधित गावात किमान महिनाभर आदीपासून एकही कोरोना बाधित नसावा, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे मार्गदर्शनात शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गावांनी कोरोना निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. यात कुणीही कुचराई करू नये, अशा सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत.

बॉक्स

समितीत यांचा समावेश

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच, सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच निमंत्रित सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी सदस्य, सचिव, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश असेल.

बॉक्स

नव्याने घेतलेला निर्णय

दोन दिवसापूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणेबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून बुधवारी पुन्हा नव्याने आठवी व बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यावेळी शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

बॉक्स

‘चला मुलांनो शाळेत चला‘ मोहीम

शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावले जावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बेंचमध्ये सहा फुटांचे अंतर. एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असावे तसेच चला मुलांनो शाळेत चला ही मोहीम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.