शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण ...

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण विभागाने जारी केला. ज्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करायचे आहेत. संबंधित गावात किमान महिनाभर आदीपासून एकही कोरोना बाधित नसावा, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे मार्गदर्शनात शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गावांनी कोरोना निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. यात कुणीही कुचराई करू नये, अशा सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत.

बॉक्स

समितीत यांचा समावेश

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच, सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच निमंत्रित सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी सदस्य, सचिव, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश असेल.

बॉक्स

नव्याने घेतलेला निर्णय

दोन दिवसापूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणेबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून बुधवारी पुन्हा नव्याने आठवी व बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यावेळी शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

बॉक्स

‘चला मुलांनो शाळेत चला‘ मोहीम

शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावले जावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बेंचमध्ये सहा फुटांचे अंतर. एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असावे तसेच चला मुलांनो शाळेत चला ही मोहीम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.