शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू अनैसर्गिक तरीही टाळले शवविच्छेदन

By admin | Updated: September 17, 2016 00:15 IST

शंकर महाराज यांच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सागर पात्रे या मुलाचा अनैसर्गिक मृत्यू झाला.

संशयास्पद : विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा करण्यात आला दावाअमरावती : शंकर महाराज यांच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सागर पात्रे या मुलाचा अनैसर्गिक मृत्यू झाला. तरीही त्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले नाही. सागरचे शवविच्छेदन न करण्यामागे काय कारण होते, हे गुढ उकलणे आता महत्त्वपूर्ण झाले आहे. तिवसा तालुक्यातील वरूडा या गावचा सागर पात्रे हा विद्यार्थी शंकर महाराज यांच्या आश्रमात शिकायला होता. पुजादी कार्यात तो जादाकाळ रमायचा. महाराजांच्या सेवेत तो असायचा. १ सप्टेंबर २००६ रोजी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान सागर अत्यवस्थ अवस्थेत आढळला. सागरला विजेचा धक्का लागल्यामुळे त्याची अशी अवस्था झाल्याचे आश्रमातील लोकांनी सागरच्या थोरल्या भावाला सांगितले. विजेचा धक्का कसा लागला याबाबतची माहिती रंजक आहे. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक इलेक्ट्रिक डोअरबेलची विद्युतभारीत वायर लोंबकळत होती. मुख्य द्वाराजवळून येताना सागरच्या डोक्याला त्या वायरचा स्पर्श झाला. वायरमधील धातुच्या उघड्या तारांचा शरीराला स्पर्श झाल्यामुळे सागरला विजेचा धक्का लागला, अशी माहिती देण्यात आली. सागरला उपचारासाठी अमरावतीपर्यंत हलविताना त्याचा मृत्यू झाला. सागरचा मृत्यू झाल्याचे कारण नैसर्गिक नव्हतेच. सागरला अखरेचा उपाय म्हणून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. नियमानुसार, अशा मृत्युनंतर शवविच्छेदन करण्यात येते. शवविच्छेदनादरम्यान मृत्यूचे नेमके कारण डॉक्टरांकडून कळू शकेल, हा त्यामागचा उद्देश असतो. सागरचा मृत्यू खरेच विजेच्या धक्क्याने झाला की आजार, विषप्रयोग, मार, दुखापत अशी इतर कारणे मृत्युमागे आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. गरज भासल्यास शरीरातील काही अवयवांचे नमुने (व्हिसेरा) शास्त्रीय तपासणीसाठी उच्च तंत्रज्ञात उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. रासायनिक तपासणी करून डॉक्टर्स मृत्यूचे नेमके निदान करीत असतात. या प्रक्रियेला सागरच्या मृत्यूनंतर छेद देण्यात आला. शोधमोहिमेदरम्यान 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार, सागरसोबत असलेल्या आश्रमातील काही लोकांनी शवविच्छेदन होऊ न देण्यासाठी शक्य तो सर्व प्रभाव वापरला. त्या प्रभावामुळेच शवविच्छेदन टाळले गेले. आश्रमात शिकण्यासाठी असलेल्या सागरचा मृत्यू अनैसर्गिकरित्या झाला असतानाही त्याचे शवविच्छेदन का करण्यात आले नाही? सागरचा मृत्यू विजेच्या धक्क्यानेच झाला काय? त्याचा पुरावा काय? त्यावेळी सागरसोबत आश्रमातील कोण लोक होते? सागरला धामणगावच्या खासगी रुग्णालयात का नेण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी चौकसपणे शोधल्यास अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा उलगडा होईल. उल्लेखनीय असे की, सागरसंबंधीच्या घटनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही दुजोरा दिला आहे. त्यांच्या स्वतंत्र तपासातदेखील हीच तथ्ये पुढे आली आहेत.