शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

मृत्यू अनैसर्गिक तरीही टाळले शवविच्छेदन

By admin | Updated: September 17, 2016 00:15 IST

शंकर महाराज यांच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सागर पात्रे या मुलाचा अनैसर्गिक मृत्यू झाला.

संशयास्पद : विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा करण्यात आला दावाअमरावती : शंकर महाराज यांच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सागर पात्रे या मुलाचा अनैसर्गिक मृत्यू झाला. तरीही त्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले नाही. सागरचे शवविच्छेदन न करण्यामागे काय कारण होते, हे गुढ उकलणे आता महत्त्वपूर्ण झाले आहे. तिवसा तालुक्यातील वरूडा या गावचा सागर पात्रे हा विद्यार्थी शंकर महाराज यांच्या आश्रमात शिकायला होता. पुजादी कार्यात तो जादाकाळ रमायचा. महाराजांच्या सेवेत तो असायचा. १ सप्टेंबर २००६ रोजी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान सागर अत्यवस्थ अवस्थेत आढळला. सागरला विजेचा धक्का लागल्यामुळे त्याची अशी अवस्था झाल्याचे आश्रमातील लोकांनी सागरच्या थोरल्या भावाला सांगितले. विजेचा धक्का कसा लागला याबाबतची माहिती रंजक आहे. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक इलेक्ट्रिक डोअरबेलची विद्युतभारीत वायर लोंबकळत होती. मुख्य द्वाराजवळून येताना सागरच्या डोक्याला त्या वायरचा स्पर्श झाला. वायरमधील धातुच्या उघड्या तारांचा शरीराला स्पर्श झाल्यामुळे सागरला विजेचा धक्का लागला, अशी माहिती देण्यात आली. सागरला उपचारासाठी अमरावतीपर्यंत हलविताना त्याचा मृत्यू झाला. सागरचा मृत्यू झाल्याचे कारण नैसर्गिक नव्हतेच. सागरला अखरेचा उपाय म्हणून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. नियमानुसार, अशा मृत्युनंतर शवविच्छेदन करण्यात येते. शवविच्छेदनादरम्यान मृत्यूचे नेमके कारण डॉक्टरांकडून कळू शकेल, हा त्यामागचा उद्देश असतो. सागरचा मृत्यू खरेच विजेच्या धक्क्याने झाला की आजार, विषप्रयोग, मार, दुखापत अशी इतर कारणे मृत्युमागे आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. गरज भासल्यास शरीरातील काही अवयवांचे नमुने (व्हिसेरा) शास्त्रीय तपासणीसाठी उच्च तंत्रज्ञात उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. रासायनिक तपासणी करून डॉक्टर्स मृत्यूचे नेमके निदान करीत असतात. या प्रक्रियेला सागरच्या मृत्यूनंतर छेद देण्यात आला. शोधमोहिमेदरम्यान 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार, सागरसोबत असलेल्या आश्रमातील काही लोकांनी शवविच्छेदन होऊ न देण्यासाठी शक्य तो सर्व प्रभाव वापरला. त्या प्रभावामुळेच शवविच्छेदन टाळले गेले. आश्रमात शिकण्यासाठी असलेल्या सागरचा मृत्यू अनैसर्गिकरित्या झाला असतानाही त्याचे शवविच्छेदन का करण्यात आले नाही? सागरचा मृत्यू विजेच्या धक्क्यानेच झाला काय? त्याचा पुरावा काय? त्यावेळी सागरसोबत आश्रमातील कोण लोक होते? सागरला धामणगावच्या खासगी रुग्णालयात का नेण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी चौकसपणे शोधल्यास अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा उलगडा होईल. उल्लेखनीय असे की, सागरसंबंधीच्या घटनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही दुजोरा दिला आहे. त्यांच्या स्वतंत्र तपासातदेखील हीच तथ्ये पुढे आली आहेत.