शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वीज प्रवाहाच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

मोर्शी : विहिरीतील मोटर पंप सुरू करण्याकरिता स्टार्टरचे वायर लावत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने त्याचा स्पर्श होऊन शेतकऱ्याचा ...

मोर्शी : विहिरीतील मोटर पंप सुरू करण्याकरिता स्टार्टरचे वायर लावत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने त्याचा स्पर्श होऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील खानापूर शिवारात सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.

आशिष रमेश उकंडे (३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. फवारणी असल्याने तो शेतात गेला होता. हल्ली शेतातील वीज ही सिंगल फेज असल्याने सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत होतो. इतर वेळी वीजपुरवठा खंडित असतो. नेमका याच वेळी वीजप्रवाह सुरू झाल्याने आशिषचा मृत्यू झाला. चार महिन्यांपूर्वी लॉकडाऊन दरम्यान आशिषचा विवाह झाला होता. त्याच्या अकस्मात मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मोर्शी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. दुपारी साडेतीनच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.