शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: December 1, 2014 22:45 IST

डिबीवरुन कृषी पंपाचा वीज प्रवाह सुरु करण्यास गेलेल्या युवा शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास भिलापूर शेतशिवारात घडली.

अमरावती : डिबीवरुन कृषी पंपाचा वीज प्रवाह सुरु करण्यास गेलेल्या युवा शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास भिलापूर शेतशिवारात घडली. अमोल ज्ञानेश्वर पाथरे (२६, रा. भिलापूर, शिरखेड) असे मृताचे नाव आहे.भिलापूर गावातील कृषिपंपाना होणारा विद्युत पुरवठा रोज खंडित होत असल्यामुळे गावकरी त्रस्त आहेत. वीज जोडणी अधिक असल्यामुळे रोज वीज पुरवठा खंडित होतो. विद्युत पुरवठा सुरळीत होण्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा वीज कंपनीला साकडे घातले. मात्र अधिकारी कायम दुर्लक्ष करीत आलेत. पिके जगविण्यासाठी शेतकरी डिबीतील फेज टाकण्याचे कार्य स्व:तच करतात. सोमवारी सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला. कृषीपंप सुरू करण्यासाठी अमोल पाथरे फेस टाकण्यास गेला. शॉक लागला. गावकऱ्यांनी अमोलला इर्विन रुग्णालयात आणले. मात्र सकाळी ११ च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. नाहक बळी गेलेल्या अमोलचा मृतदेह इर्विनमध्ये शवविच्छेदनासाठी ताटकळत ठेवण्यात आला. मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप होता. आमदार यशोमती ठाकूर इर्विनमध्ये पोहोचल्या. त्यांनी प्रशासनाला धारेवर धल्यावर पीएम करण्यात आले. (प्रतिनिधी)