शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिवंतपणीच ‘ते’ भोगताहेत मरणयातना!

By admin | Updated: January 21, 2016 00:35 IST

‘जाताना इतके मजला सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ जीवनाच्या खडतरपणाला अधोरेखित करून जगण्यापेक्षा मरणेच सोपे, हे हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत सांगणारी गजलकार सुरेश भट..

लोकमत विशेष

वैभव बाबरेकर अमरावती‘जाताना इतके मजला सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ जीवनाच्या खडतरपणाला अधोरेखित करून जगण्यापेक्षा मरणेच सोपे, हे हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत सांगणारी गजलकार सुरेश भट यांच्या प्रसिध्द गझलेच्या या ओळी आहेत. शहरातील अनेक निराधार वृध्द रस्त्याच्या कडेला केविलवाणे जिणे जगताना अक्षरश: मरण मागत आहेत. जीवंतपणी भोगाव्या लागणाऱ्या मरणयातनांच्या तुलनेत प्रत्यक्ष मरण आलेले काय वाईट? असे आर्जव त्यांच्या डोळ्यांत दिसते. इर्विन चौकातील परिचर्या वसतिगृहासमोरील फूटपाथवर नजर गेली की कुठल्याही संवेदनशील माणसाचे मन गलबलून येतेच. उघड्यावर ऊन, पाऊ, थंडीचा मारा सोसत, घाणीत लिडबिडलेल्या अवस्थेतील हे निराधार मरणाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांचा कुणीही वाली नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असताना या निराधार वृध्दांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी कोणाची, हा रटाळ प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. शहरात शेकडो निराधार नागरिक आहेत. त्यातील वृध्दांची अक्षरश: फरफट सुरू आहे. शहरातील रिकामे फूटपाथ, पुलाखालची आडोशाची जागा मिळवून तिथेच मरण येईपर्यंत ते राहतात. या निराधारांसाठी प्रशासनासह समाजसेवी संस्थांनी पुढे यायला हवे. पण, अशा निराधारांच्या पुनर्वसनासाठी या संस्थाही फारशा उत्सुक दिसून येत नाहीत. इर्विनसमोरील परिचर्या वसतिगृहाच्या फूटपाथवर पूर्वी चार ते पाच वृध्द भिकारी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना भीक मागून कसेबसे पोट भरत आहेत. दैनंदिन गरजांसाठी उठून दुसरीकडे जाण्याची त्यांच्या शरीरात ताकद नसल्याने तेथेच घाण करतात. याच घाणीत लिडबिडत पडून राहण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही. पावसात ते भिजतात, उन्हात करपतात आणि थंडीत कुडकुडतात. त्यांच्या आसपासच्या परिसरात कोणी दुर्गंधीमुळे उभाही राहू शकत नाही. मरणप्राय जीणे जगत असताना हजारोे लोक त्यांच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून पुढे निघून जातात. प्रशासनाला आणि कुठल्याही समाजसेवी संस्थेला त्यांच्या पुनर्वसनाची गरज भासत नाही. या सर्वच वृध्दांना औषधोपचाराची गरज आहे. मात्र, त्यांना आरोग्य सेवा पुरविणारा कोणीच नाही. इर्विन परिसरात एका ठिकाणी अन्नदान केले जाते. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी ते वृध्द वाहनांच्या वर्दळीतून हातपाय घासत रस्ता ओलांडून तेथे जातात. जेवण झाले की पुन्हा हातपाय घासत वसतिगृहाच्या फुटपाथवर येतात. अनोळखी निराधारांसाठी महापालिकेने सोय निवाऱ्याची सोय केली आहे. मात्र, त्यांना फुटपाथवरून उचलून त्या ठिकाणी नेणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबानगरीसाठी दुर्दैवाची बाबअमरावती : खडतर जीवन जगताना या वृध्दांना कोणाचीही मदत मिळत नाही. एखाद्या वाटसरूला दया आली तर त्यांना एखादे ब्लँकेट, गादी किंवा चादर, कधी-कधी एखादा कपडा मिळतो. कुणी दयाळू कधी-कधी ताटभर अन्न देऊन जाते. त्यातच काय तो निर्वाह करायचा. प्रशासन या निराधार वृध्दांचा मृत्यू झाला की मात्र लगेच दखल घेते. त्यांना उचलून शवविच्छेदन गृहात नेले जाते. तीन-चार दिवस नातलगांची प्रतीक्षा करून अंत्यसंस्कारही केले जातात. मात्र, जिवंतपणी नरकयातना भोगणाऱ्या या वृध्दांना जीवंत असताना मदतीचा हात देण्यास कुणीही पुढे येत नाही, हे भयकंर वास्तव आहे. म्हणूनच घाणीत, दुर्गंधीत खितपत पडलेले हे वृध्द मरणाची डोळ्यांत प्राण आणून प्रतीक्षा करताना दिसतात. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सुसंस्कृत अंबानगरीचे हे दुर्देवच काय?