शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मृग बहराच्या विमा परताव्यात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी ११ हजार ७०० रुपयांचा लाभ मिळाला. विमा परतावा कमी मिळाल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये असंतोष आहे. कमी पावसाची नोंद असतानाही शेतकऱ्यांना नोंदीनुसार विम्याच्या रकमेत कपात करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रार करून महसुली पर्जन्यमापक यंत्रामध्ये झालेल्या नोंदीनुसार विमा रक्कम देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देजुलैमध्ये १३९ मिंमी पाऊस? : संत्राउत्पादकांना मिळाला अत्यल्प निधी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील सातही मंडळांतील पर्जन्यमानाच्या नोंदी महसूल विभाग आणि महावेध यांच्यावतीने घेतल्या जातात. परंतु, महसूल आणि महावेध या दोहोंच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने शेंदूरजनाघाट मंडळातील संत्राउत्पादक शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी ११ हजार ७०० रुपयांचा लाभ मिळाला. विमा परतावा कमी मिळाल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये असंतोष आहे.कमी पावसाची नोंद असतानाही शेतकऱ्यांना नोंदीनुसार विम्याच्या रकमेत कपात करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रार करून महसुली पर्जन्यमापक यंत्रामध्ये झालेल्या नोंदीनुसार विमा रक्कम देण्याची मागणी केली आहे.पुनर्रचित हवामान आधारित संत्रा मृग बहार पीक विमा योजना २०१९ मध्ये राज्यातील १२ जिल्हे समाविष्ट आहेत. योजनेनुसार, १५ जून ते १५ जुलै दरम्यान पावसाची नोंद घेऊन १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस असल्यास ३८ हजार ५०० रुपये विमा परतावा, तर १२४ ते १५० मिमीपर्यंत पाऊस असल्यास ११ हजार ७०० रुपये लाभ देण्यात येतो. जिल्ह्याच्या काही तालुक्यांतील महसूल मंडळांमधील शेतकºयांना महसूल विभागाकडून घेतलेल्या पावसाच्या नोंदी व महावेधने घेतलेल्या नोंदीचा तफावतीचा फटका बसला. यामध्ये दुष्काळाचा डबल ट्रिगर असताना, सिंगल ट्रिगरला देय रक्कमच विमा कंपनीकडून देण्यात आली.वरूड ताुलक्यातील शेंदूरजनाघाट मंडळात १५ जून ते १५ जुलै दरम्यान केवळ ४३ मिमी पावसाची नोंद असताना, विमा कंपनीच्या महावेध (स्कायमेट) मध्ये ही नोंद १३९.०५ मिमी आहे. १५ जुलैपर्यंत पेरण्यासुद्धा झालेल्या नव्हत्या. कोरड्या दुष्काळाचे सावट होते. बजाज अलायन्स या विमा कंपनीने ऑनलाइन उपलब्ध असलेली आकडेवारी ग्राह्य धरली. त्यामुळे विमा परतावा हेक्टरी ३८ हजार ५०० रुपये ऐवजी फक्त ११ हजार ७०० रुपये देण्यात आला.शेंदूरजनाघाट मंडळातील संत्राउत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. महसूल विभागाकडील पर्जन्यमान नोंद ही अधिकृत आहे. त्याआधारे उर्वरित प्रत्येकी २६ हजार ८०० रुपयांची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी विवेक फुटाणे, अमित फरकाडे, संजय येवले, शंकर बेलसरे, शिवनारायण अढाऊ, सारंग गणोरकर, तेजस बेलसरे, प्रकाश कुबडे, किशोर बेलसरे आदींनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी