शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले

By admin | Updated: February 11, 2015 00:23 IST

पोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असतांना ....

लोकमत विशेषमोहन राऊत अमरावतीपोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असतांना मागील पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व निवडणूका सांभाळताना पोलीस पाटलांची मोठी कसरत होते़ गावातील दोन गट एकमेकांसमोर उभे झाल्यानंतर पोलीस पाटलांना मध्यस्थी करतांना स्वत:चा जीव धोक्यात टाकावा लागतो़ तंटामुक्त गाव अभियान यशस्वी करण्यात पोलीस पाटलांची महत्वाची भूमिका आहे़ मागील शासनाने मानधन वाढविण्यासंदर्भात आश्वासन दिले होते़ परंतु हे आश्वासन हवेतच विरले आहे़ आज राज्यात तंटामुक्त ग्राम अभियान पोलीस पाटलामुळे यशस्वी झाले आहे़ पोलीस पाटलासाठी प्रत्येक गावात शासकीय कार्यालय देण्याचा ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढला परंतु या अध्यादेशाची अमंलबजावणी आजपर्यंत झाली नाही़राज्यातील प्रत्येक गावात पोलीस पाटील नियुक्त करण्याचे तथा रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकणे गरजेचे होते़ आजही दहा ते पंधरा गावांचा प्रभार एका पोलीस पाटलाला सांभाळावा लागतो़ अनेक गावांचा कारभार सांभाळताना पोलीस पाटील गावच्या राजकीय दुषित वातावरणाचा बळी ठरत आहे़ आजपर्यंत राज्यातील अनेक पोलीस पाटलांवर चौकशी न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ विशेषत: ज्या गावाचा अतिरीक्त कारभार सांभाळला त्या गावांचा वेतन स्वरूपात मोबदला मिळत नाही़ गावातील शातंता सुव्यवस्था कायम ठेवणे, अनेक कामावर आळा घालणे, चोरी व विविध घटनेकडे लक्ष ठेवून ग्रामस्थांचे सरंक्षण करण्याचे काम पोलीस पाटलावर आहे़ आपले कर्तव्य ईमानेइतबारे सांभाळत असताना आजही मानधनाचा सात हजार रूपयांचा प्रश्न, वयाच्या ६५ वर्षापर्यंत सेवा, गावातील पोलीस पाटलांची रिक्त पदे, निवृत्त वेतन, अनुकंपा मध्ये पोलीस पाटलांच्या वारसांची नियुक्ती, आजारासाठी लागणारा वैद्यकीय खर्च असे अनेक प्रश्न शासनदरबारी पडले आहेत. आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ले झाले त्यांची चौकशीही थंडबस्त्यात असल्याची पोलीस पाटील संघटनेची तक्रार आहे़