शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले

By admin | Updated: February 11, 2015 00:23 IST

पोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असतांना ....

लोकमत विशेषमोहन राऊत अमरावतीपोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असतांना मागील पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व निवडणूका सांभाळताना पोलीस पाटलांची मोठी कसरत होते़ गावातील दोन गट एकमेकांसमोर उभे झाल्यानंतर पोलीस पाटलांना मध्यस्थी करतांना स्वत:चा जीव धोक्यात टाकावा लागतो़ तंटामुक्त गाव अभियान यशस्वी करण्यात पोलीस पाटलांची महत्वाची भूमिका आहे़ मागील शासनाने मानधन वाढविण्यासंदर्भात आश्वासन दिले होते़ परंतु हे आश्वासन हवेतच विरले आहे़ आज राज्यात तंटामुक्त ग्राम अभियान पोलीस पाटलामुळे यशस्वी झाले आहे़ पोलीस पाटलासाठी प्रत्येक गावात शासकीय कार्यालय देण्याचा ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढला परंतु या अध्यादेशाची अमंलबजावणी आजपर्यंत झाली नाही़राज्यातील प्रत्येक गावात पोलीस पाटील नियुक्त करण्याचे तथा रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकणे गरजेचे होते़ आजही दहा ते पंधरा गावांचा प्रभार एका पोलीस पाटलाला सांभाळावा लागतो़ अनेक गावांचा कारभार सांभाळताना पोलीस पाटील गावच्या राजकीय दुषित वातावरणाचा बळी ठरत आहे़ आजपर्यंत राज्यातील अनेक पोलीस पाटलांवर चौकशी न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ विशेषत: ज्या गावाचा अतिरीक्त कारभार सांभाळला त्या गावांचा वेतन स्वरूपात मोबदला मिळत नाही़ गावातील शातंता सुव्यवस्था कायम ठेवणे, अनेक कामावर आळा घालणे, चोरी व विविध घटनेकडे लक्ष ठेवून ग्रामस्थांचे सरंक्षण करण्याचे काम पोलीस पाटलावर आहे़ आपले कर्तव्य ईमानेइतबारे सांभाळत असताना आजही मानधनाचा सात हजार रूपयांचा प्रश्न, वयाच्या ६५ वर्षापर्यंत सेवा, गावातील पोलीस पाटलांची रिक्त पदे, निवृत्त वेतन, अनुकंपा मध्ये पोलीस पाटलांच्या वारसांची नियुक्ती, आजारासाठी लागणारा वैद्यकीय खर्च असे अनेक प्रश्न शासनदरबारी पडले आहेत. आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ले झाले त्यांची चौकशीही थंडबस्त्यात असल्याची पोलीस पाटील संघटनेची तक्रार आहे़