शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कावलीतील जुन्या ग्रामपंचायत इमारतीचा नागरिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

स्थानिक जुन्या ग्रामपंचायतीची इमारत सद्य:स्थितीत धोकादायक असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे समजते. या इमारतीमध्ये अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे मुख्य ...

स्थानिक जुन्या ग्रामपंचायतीची इमारत सद्य:स्थितीत धोकादायक असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे समजते.

या इमारतीमध्ये अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यालय होते; परंतु गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची नवी इमारत झाल्याने या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याने ती आता पडक्या स्थितीत उभी आहे.

या ऐतिहासिक इमारतीमध्ये मंगरूळ दस्तगीर येथील गणपती महाराजांनी वास्तव्य केले. सोबतच अनेक साहित्याची निर्मिती या इमारतीमधूनच झाल्याचे सांगितले जाते.

याच इमारतीत गावात इमारत उपलब्ध नसल्याने शाळा भरवली गेली. येथूनच अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे घेतले व आता मोठ्या हुद्द्यावर येथील नागरिक आहेत. मात्र, ज्या इमारतीमधून अनेक डॉक्टर, वकील, साहित्यिक, इंजिनिअर असे नागरिक निर्माण केले; परंतु या इमारतीकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे.

सदर इमारतीमध्ये प्रवेश केआ असता इमारतीच्या मुख्य खांबावर तसेच भिंतीवर अनेक माणसाच्या मनाला चालना देणाऱ्या व शैक्षणिक अशा म्हणी लिहिलेल्या दिसून येतात. मात्र, सद्य:स्थितीत ही इमारत केवळ मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनली आहे.

या इमारतीचा वरचा भाग कवेलू पूर्ण निकामी होऊन फुटल्या गेल्याने त्यामधून पावसाचे पाणी मध्ये पडते. सोबतच शंभर वर्षांच्या वर या इमारतीचे आयुष्य झाले असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे भिंती पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत. या इमारतीच्या सभोवताल अनेक नागरिक वास्तव्य करतात. मात्र आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी ते वास्तव्य करतात. त्यांच्या जीविताला धोका झाला, तर याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न मात्र नागरिकांनी उपस्थित केला आहे.

याच इमारतीत ज्ञानदान, समाजसेवा, गावाचा सर्वांगीण विकास अशा अनेक चर्चा तेथे रंगल्या गेल्या; परंतु आता मात्र या इमारतीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने ही इमारत कोसळल्याशिवाय राहणार नसल्याचे समजते.

सदर इमारतीसाठी मध्यंतरी अनेक सामाजिक कार्यकर्ते आरक्षण करण्यासाठी पुढे आले होते; परंतु त्याचा तीळमात्रही फायदा झाला नसल्याने ही इमारत मात्र पुन्हा दुर्लक्षित झाली आहे. सदर इमारतीकडे पुरातन विभागाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.