शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

अतिवृष्टी झाल्यास ४८१ गावांना धोका, प्रशासनाचा अलर्ट, आपत्कालीन यंत्रणा सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

(असाईनमेंट) अमरावती : जिल्ह्यात नदी-नाल्याच्या काठावर असलेली ४८१ गावे पूरप्रवण आहेत, या भागात अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो, ...

(असाईनमेंट)

अमरावती : जिल्ह्यात नदी-नाल्याच्या काठावर असलेली ४८१ गावे पूरप्रवण आहेत, या भागात अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी प्रशासनाद्वारे वेळोवेळी अलर्ट देण्यात येतो. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास संबंधित तालुक्यासह जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात ९ जुलैपासून मान्सून सक्रिय झाल्यानंतर संततधार पावसामुळे किमान ४०० गावे बाधित झाल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. या पावसाने धरणे ओव्हर-फ्लो झाल्याने गेट उघडण्यात आली. परिणामी नद्या प्रवाहित झाल्या व नदीकाढच्या गावांमध्ये पाणी शिरले. याशिवाय काठालगतची १० हजार हेक्टर शेतीही खरडली गेली. जिल्ह्यात सद्यस्थिती सरासरीच्या १३० टक्के पाऊस झाल्यामुळे आगामी काळात या गावामंध्ये पुन्हा पुरामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात वडाली, महादेव खोरी, छत्री तलाव, माताखिडकी, अंबा नालालगतची वस्ती, जोडमोड, लालखडी, चुनाभट्टी व नमुना भागात पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात.

बॉक्स

तालुकानिहाय पूरप्रवण गावे

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ६३, तिवसा ४८, भातकुली ३४, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ५६, अचलपूर ५५, चांदूर बाजार २६, चांदूर रेल्वे ६, धामणगाव २७, नांदगाव खंडेश्वर २४, मोर्शी ३८, वरूड ५१, धारणी ७ व चिखलदरा तालुक्यात निरंक आहे. याशिवाय अमरावती शहरातील १५ भागात पावसाच्या पाण्याचा धोका आहे.

बॉक्स

प्रशासनाचे तेच ते रडगाणे

पावसाळ्यात नदी-नाल्यांचे पाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीच घडतात, त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला न जाणे महत्त्वाचे आहे. याशिवाय धरणाचे गेट उघडल्यामुळेही नद्या प्रवाहित होतात. अनेकदा पुलाच्या पायलीला कचरा अटकतो. त्यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. याशिवाय नदीपात्रातील अतिक्रमणांमुळेही पुराचा धोका वाढतो.

बॉक्स

पाणी साचण्यांची कारणे

१) नदी-नाल्यांच्या पात्रात झालेल्या अतिक्रमणांमुळे अनेकदा काठालगतची गावे, वस्त्यांमध्ये पाणी शिरते.

२) धरणांची गेट उघडण्यात आल्यामुळे नदी नाले प्रवाहित होतात व त्यामुळे काठालगतची गावे, वस्त्या व शेतांमध्ये नुकसान होते.

३) गावे व शहरामंध्ये पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सांडपाणी रस्त्यांवर येते.

कोट

पाऊस नको-नकोसा!

पावसामुळे आमच्या भातकुली तालुक्यातील नदी-नाल्यांंना पूर आला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पेरणी झालेले शेत खरडले. आम्ही नुकसानभरपाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.

- रमेश वानखडे, शेतकरी

शहरात अनेक भागात सिमेंटचे रस्ते बांधण्यात आले. ते उंच व आमचे घर ठेंगणे अशी स्थिती आहे. रस्त्यांचे पाणी व्यवस्थित बाहेर न काढल्यामुळे तुंबले व आमच्या घरात व लगतच्या संकुलांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याची स्थिती ओढावली.

संदीप ठाकरे, नागरिक