शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झाल्यास ४८१ गावांना धोका, प्रशासनाचा अलर्ट, आपत्कालीन यंत्रणा सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

(असाईनमेंट) अमरावती : जिल्ह्यात नदी-नाल्याच्या काठावर असलेली ४८१ गावे पूरप्रवण आहेत, या भागात अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो, ...

(असाईनमेंट)

अमरावती : जिल्ह्यात नदी-नाल्याच्या काठावर असलेली ४८१ गावे पूरप्रवण आहेत, या भागात अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी प्रशासनाद्वारे वेळोवेळी अलर्ट देण्यात येतो. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास संबंधित तालुक्यासह जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात ९ जुलैपासून मान्सून सक्रिय झाल्यानंतर संततधार पावसामुळे किमान ४०० गावे बाधित झाल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. या पावसाने धरणे ओव्हर-फ्लो झाल्याने गेट उघडण्यात आली. परिणामी नद्या प्रवाहित झाल्या व नदीकाढच्या गावांमध्ये पाणी शिरले. याशिवाय काठालगतची १० हजार हेक्टर शेतीही खरडली गेली. जिल्ह्यात सद्यस्थिती सरासरीच्या १३० टक्के पाऊस झाल्यामुळे आगामी काळात या गावामंध्ये पुन्हा पुरामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात वडाली, महादेव खोरी, छत्री तलाव, माताखिडकी, अंबा नालालगतची वस्ती, जोडमोड, लालखडी, चुनाभट्टी व नमुना भागात पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात.

बॉक्स

तालुकानिहाय पूरप्रवण गावे

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ६३, तिवसा ४८, भातकुली ३४, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ५६, अचलपूर ५५, चांदूर बाजार २६, चांदूर रेल्वे ६, धामणगाव २७, नांदगाव खंडेश्वर २४, मोर्शी ३८, वरूड ५१, धारणी ७ व चिखलदरा तालुक्यात निरंक आहे. याशिवाय अमरावती शहरातील १५ भागात पावसाच्या पाण्याचा धोका आहे.

बॉक्स

प्रशासनाचे तेच ते रडगाणे

पावसाळ्यात नदी-नाल्यांचे पाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीच घडतात, त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला न जाणे महत्त्वाचे आहे. याशिवाय धरणाचे गेट उघडल्यामुळेही नद्या प्रवाहित होतात. अनेकदा पुलाच्या पायलीला कचरा अटकतो. त्यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. याशिवाय नदीपात्रातील अतिक्रमणांमुळेही पुराचा धोका वाढतो.

बॉक्स

पाणी साचण्यांची कारणे

१) नदी-नाल्यांच्या पात्रात झालेल्या अतिक्रमणांमुळे अनेकदा काठालगतची गावे, वस्त्यांमध्ये पाणी शिरते.

२) धरणांची गेट उघडण्यात आल्यामुळे नदी नाले प्रवाहित होतात व त्यामुळे काठालगतची गावे, वस्त्या व शेतांमध्ये नुकसान होते.

३) गावे व शहरामंध्ये पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सांडपाणी रस्त्यांवर येते.

कोट

पाऊस नको-नकोसा!

पावसामुळे आमच्या भातकुली तालुक्यातील नदी-नाल्यांंना पूर आला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पेरणी झालेले शेत खरडले. आम्ही नुकसानभरपाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.

- रमेश वानखडे, शेतकरी

शहरात अनेक भागात सिमेंटचे रस्ते बांधण्यात आले. ते उंच व आमचे घर ठेंगणे अशी स्थिती आहे. रस्त्यांचे पाणी व्यवस्थित बाहेर न काढल्यामुळे तुंबले व आमच्या घरात व लगतच्या संकुलांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याची स्थिती ओढावली.

संदीप ठाकरे, नागरिक