शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २१,१९९ हेक्टरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात १४ तालुक्यातील ३२८ ...

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात १४ तालुक्यातील ३२८ गावांमध्ये नदी, नाल्यांना पूर येऊन २१ हजार १९९ हेक्टरमधील पिके बाधित झालेली आहे. यात भिंत पडून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय ४१२ घरांची पडझड झालेली आहे.

विभागात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात पावसाने नुकसान झाले व वशिम, बुलडाण्यात स्थिती निरंक आहे. बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, कोठा, जोडमोहा, दारव्हा, चिखली, मांगकिन्ही, बोरी, लालखेड, महागाव, तिवरी, कलगाव, आर्णी, जवळा, लोणबेहळ, अंजनखेड, गणेशपूर, शिबला, पाटनबोरी, व मालखेड मंडळांमधील १२० गावांमध्ये पावसाने नुकसान झालेले आहे. यामध्ये २८० घरांचे अंशत: नुकसान झाले. ७,९४३ हेक्टर क्षेत्रातील पिके खरडल्या गेलेली आहे. याशिवाय १२ जुलैच्या पावसाने नेर तालुक्यातील मालखेड मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने ८६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अकोला जिल्ह्यात मुर्तिजापूर तालुक्यातील १५ गावांमध्ये ६ घरे व २५ हेक्टरमधील पिके, अकोट तालुक्यातील १२ गावाममध्ये एक घराचे नुकसान व ११० हेक्टरमधील पिके, तेल्हारा तालुक्यात ३ गावांध्ये तीन घरे, बाळापूर तालुक्यातील कासारखेडमध्ये ९ वर्षांचा बालकाचा भिंत कोसळून व बटवाडी येथे एका बैलाचा वीज पडून मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

अमरावती जिल्ह्यात १६६ गावे बाधित

अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले. जिल्ह्यातील १६६ गावे बाधित झाली. यामध्ये दर्यापूर तालुक्यात ११५ घरांचे अंशत: नुकसान झाले, तर १२,६६० हेक्टरमधील पिके खरडून गेली. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १२ गावे बाधित झाली व सात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ७४ हेक्टरमधील पिके खरडून गेली व ३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.