शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्ह्यातील डेअरी फार्म पुनर्जीवित होणार

By admin | Updated: November 14, 2016 00:14 IST

नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन ...

सर्वेक्षण : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनाअमरावती : नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन विभागाने मरणासन्न शेळी, मेंढी पालन केंद्र पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला आहे. डेअरी फार्ममधून दुग्धगंगा वाहण्यासाठी जिल्ह्यात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यातील पोहरा व धारणी येथे शेळी, मेंढी, गाय, म्हशी पालन केंद्र आहे. यापैकी तीन पशुपालन केंद्र बंद पडले आहे. या तीनही बंद पडलेल्या पशुपालन केंद्रातील कर्मचारी अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. मात्र विदर्भात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीसोबत जोडधंदा हा दुधाचा असून तोच प्रयोग जिल्ह्यात राबविण्याचा निश्चय शासनाचा आहे. एक डेअरी फार्म पुनर्जिवित करण्यासाठी १७ ते १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याअनुषंगाने सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याची जबाबदारी अकोला येथील पशुधन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना दुधाळू गुरांचे वाटप केले जाईल. शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यासाठी अद्ययावत दूध संकलन केंद्र साकारले जाणार आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी शासनकर्ते सकारात्मक पावले उचलत आहेत. तसेच बंद पडलेले तीन डेअरी फार्म विकसित केले जाणार आहे. पशुधन विकास महामंडळाला डेअरी फार्म विकसित करण्यासह शेतकऱ्यांना दुधाळू जनावरांचे वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना गुरे वाटप करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना दुधाळू गुरे वाटप करण्यात आलीत त्या शेतकऱ्यांकडून चांगल्या दरात दूध खरेदी करण्याचेही प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)