शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील डेअरी फार्म पुनर्जीवित होणार

By admin | Updated: November 14, 2016 00:14 IST

नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन ...

सर्वेक्षण : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनाअमरावती : नापिकी, सततच्या दुष्काळाने विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याच्या पशू संवर्धन विभागाने मरणासन्न शेळी, मेंढी पालन केंद्र पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला आहे. डेअरी फार्ममधून दुग्धगंगा वाहण्यासाठी जिल्ह्यात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यातील पोहरा व धारणी येथे शेळी, मेंढी, गाय, म्हशी पालन केंद्र आहे. यापैकी तीन पशुपालन केंद्र बंद पडले आहे. या तीनही बंद पडलेल्या पशुपालन केंद्रातील कर्मचारी अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. मात्र विदर्भात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीसोबत जोडधंदा हा दुधाचा असून तोच प्रयोग जिल्ह्यात राबविण्याचा निश्चय शासनाचा आहे. एक डेअरी फार्म पुनर्जिवित करण्यासाठी १७ ते १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याअनुषंगाने सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. डेअरी फार्म पुनर्जिवित करण्याची जबाबदारी अकोला येथील पशुधन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना दुधाळू गुरांचे वाटप केले जाईल. शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यासाठी अद्ययावत दूध संकलन केंद्र साकारले जाणार आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात दुग्धगंगा वाहिली पाहिजे, यासाठी शासनकर्ते सकारात्मक पावले उचलत आहेत. तसेच बंद पडलेले तीन डेअरी फार्म विकसित केले जाणार आहे. पशुधन विकास महामंडळाला डेअरी फार्म विकसित करण्यासह शेतकऱ्यांना दुधाळू जनावरांचे वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना गुरे वाटप करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना दुधाळू गुरे वाटप करण्यात आलीत त्या शेतकऱ्यांकडून चांगल्या दरात दूध खरेदी करण्याचेही प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)