शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

जिल्ह्यात पुन्हा १६ ते २२ मे दरम्यान संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

अमरावती: राज्य शासनाने १ जून पर्यत संचारबंदीचे आदेश जारी केले आहे. मात्र, कोरोना संसर्गाची स्थिती बघता अमरावती जिल्ह्याकरिता पुन्हा ...

अमरावती: राज्य शासनाने १ जून पर्यत संचारबंदीचे आदेश जारी केले आहे. मात्र, कोरोना संसर्गाची स्थिती बघता अमरावती जिल्ह्याकरिता पुन्हा १६ ते २२ मे रोजी रात्री १२ वाजता या कालावधीत कठोर निर्बंधासह संचारबंदीचे आदेश जिल्हधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केले आहे. यात जवळपास पूर्वीचेच निर्बंध कायम असून, कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील, हे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ९ ते १५ मे दरम्यान संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, रूग्णांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. नव्या आदेशात किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थाची दुकाने बंद राहतील. मात्र, सकाळी ७ ते ११ या कालावधीत घरपोच सेवा सुरु राहील. ग्राहकांना दुकानात जाऊन वस्तू, साहित्य खरेदी करता येणार नाही. कृषी अवजारे व उत्पादनाशी निगडीत संब्ंधित दुकाने बंद असतील. दूध संकलन केंद्र व दूध घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत करता येणार आहे. लग्न समारंभात १५ लोकांना परवानगी असेल.

------------------

घरपोच पार्सल सेवा

हाॅटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजता दरम्यान घरपोच सेवा सुरु असेल.

-----------------

अत्यावश्यक वाहनांना मुभा

अत्यावश्यक सेवेतील सार्वजनिक अथवा खासगी वाहनांना परवानगी राहील. ओळखपत्र अनिवार्य असेल. तसेच रूग्ण वाहतूक, माल वाहतूक करणाऱ्या वाहने, शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही. पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहन चालकांना ईंधन मिळणार आहे. ट्रॅक्टर, टॅंकरचा देखील समावेश करण्यात आला आहे.

----------------

हे राहील सुरू

खासगी, शासकीय रूग्णालयातील सेवा नियमित वेळेत सुरू राहतील. मेडिकल, दवाखाने, ऑनलाईन औषधी सेवा सुरू राहील. ऑनलाईन शिकवणी आणि परीक्षा घेण्यास प्रतिबंध राहणार नाही. बॅंका, पोस्ट, पतसंस्था सकाळी १० ते ३ पर्यंत सुरु राहतील. एमआयडीसीतील उद्योग, कारखाने.

-------------------

हे असेल बंद

चित्रपट गृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, सभागृहे, खासगी क्रीडांगणे, केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर,उद्यान, बगिचे, सेतू सेवा केंद्र,