शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

ग्रामीण भागात तोरणाला गर्दी, अन्‌ मरणालाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष चांदूर बाजार : कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्याला चिंतेत टाकणारा ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू ...

प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदूर बाजार : कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्याला चिंतेत टाकणारा ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. परंतु ह्या निर्बंधाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निर्बंध असतानाही लग्नातील तोरण आणि मरणाच्या ठिकाणाची गर्दी कमी झालेली नाही.

जिल्ह्यात फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ही वाढ आजपर्यंत कायम आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्या अंमलातही येऊ लागल्या आहेत. जिल्हाभर जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन अशा प्रकारचे निर्बंध लादल्या जात आहे. अशात फेब्रुवारी ते मे या महिन्यात लग्नसराईच्या धूम सुरू आहे.

लग्नसोहळ्यात २५ वऱ्हाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असताना घरोघरी मोठमोठे लग्न सोहळे साजरे केले जात आहे. नागरिकांनी केवळ लग्नाचे ठिकाण बदलले असून ते आता लॉन, मंगल कार्यालय ऐवजी आपल्या कॉलनीत किंवा घरासमोर मंडप टाकून केल्या जात आहे. यात उपस्थित लोकांची संख्या कमी झालेली नाही. केवळ नवरदेवाची वाजत-गाजत मिरवणूक वगळता सर्वच प्रक्रिया धूमधडाक्यात पार पडल्या जात आहे. यात सर्वाधिक लग्न सोहळे ग्रामीण भागात होत आहे.

अनेक लग्न सोहळा मध्ये ३०० ते ४०० पेक्षा अधिक जणांची उपस्थिती दिसत आहे. यावर ग्रामीण भागात तर हळदीचा कार्यक्रम सर्रास डीजे, बँड लावून साजरा केल्या जात आहे.

मरणालाही गर्दी

अंत्यसंस्कारासाठी सुद्धा २० पेक्षा कितीतरी पटीने नागरिकांची उपस्थिती असते. परंतु या दोनही ठिकाणी होणाऱ्या गर्दीकडे संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिल्या जात नाही. अथवा या परिस्थितीबाबत कोणीही तक्रार करीत नाही. तसेच ज्यांची जबाबदारी व निर्बंधाची अंमलबजावणी करून घेण्याची आहे असे अधिकारीही लक्ष देत नाही. उलट अशा लोकांची गर्दी चर्चेत राहते, अशी गर्दी मग त्यांना अभिमानास्पद वाटू लागते. सुखात गेले नाही तरी चालेल, मात्र दु:खात गेले पाहिजे, अशी ग्रामीणांची भावना असते. कोरोनाकाळातही ती प्रबळ ठरत आहे.

बॉक्स

पोलीसच हवे

आता ग्रामीण भागात होणारी अशी गर्दी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनने पुढे आले पाहिजे. जेणेकरून वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या वर्षी सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव चा फटका अनेक ग्रामीण भाग बचावला होता. तसेच पहिल्या लाटेत तालुका, पोलीस, आरोग्य प्रशासनाने रस्त्यावर उतरून कोरोना पासून गाव खेडे वाचविली होती. मात्र या दुसऱ्या लाटेने सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागात बसत आहे. या लाटेत नागरिकांचा गलथान कारभार सह प्रशासन ची हेतुपुरस्सर डोळेझाक ही कारणीभूत ठरत आहे.