शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात तोरणाला गर्दी, अन्‌ मरणालाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष चांदूर बाजार : कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्याला चिंतेत टाकणारा ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू ...

प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदूर बाजार : कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्याला चिंतेत टाकणारा ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. परंतु ह्या निर्बंधाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निर्बंध असतानाही लग्नातील तोरण आणि मरणाच्या ठिकाणाची गर्दी कमी झालेली नाही.

जिल्ह्यात फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ही वाढ आजपर्यंत कायम आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्या अंमलातही येऊ लागल्या आहेत. जिल्हाभर जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन अशा प्रकारचे निर्बंध लादल्या जात आहे. अशात फेब्रुवारी ते मे या महिन्यात लग्नसराईच्या धूम सुरू आहे.

लग्नसोहळ्यात २५ वऱ्हाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असताना घरोघरी मोठमोठे लग्न सोहळे साजरे केले जात आहे. नागरिकांनी केवळ लग्नाचे ठिकाण बदलले असून ते आता लॉन, मंगल कार्यालय ऐवजी आपल्या कॉलनीत किंवा घरासमोर मंडप टाकून केल्या जात आहे. यात उपस्थित लोकांची संख्या कमी झालेली नाही. केवळ नवरदेवाची वाजत-गाजत मिरवणूक वगळता सर्वच प्रक्रिया धूमधडाक्यात पार पडल्या जात आहे. यात सर्वाधिक लग्न सोहळे ग्रामीण भागात होत आहे.

अनेक लग्न सोहळा मध्ये ३०० ते ४०० पेक्षा अधिक जणांची उपस्थिती दिसत आहे. यावर ग्रामीण भागात तर हळदीचा कार्यक्रम सर्रास डीजे, बँड लावून साजरा केल्या जात आहे.

मरणालाही गर्दी

अंत्यसंस्कारासाठी सुद्धा २० पेक्षा कितीतरी पटीने नागरिकांची उपस्थिती असते. परंतु या दोनही ठिकाणी होणाऱ्या गर्दीकडे संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिल्या जात नाही. अथवा या परिस्थितीबाबत कोणीही तक्रार करीत नाही. तसेच ज्यांची जबाबदारी व निर्बंधाची अंमलबजावणी करून घेण्याची आहे असे अधिकारीही लक्ष देत नाही. उलट अशा लोकांची गर्दी चर्चेत राहते, अशी गर्दी मग त्यांना अभिमानास्पद वाटू लागते. सुखात गेले नाही तरी चालेल, मात्र दु:खात गेले पाहिजे, अशी ग्रामीणांची भावना असते. कोरोनाकाळातही ती प्रबळ ठरत आहे.

बॉक्स

पोलीसच हवे

आता ग्रामीण भागात होणारी अशी गर्दी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनने पुढे आले पाहिजे. जेणेकरून वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या वर्षी सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव चा फटका अनेक ग्रामीण भाग बचावला होता. तसेच पहिल्या लाटेत तालुका, पोलीस, आरोग्य प्रशासनाने रस्त्यावर उतरून कोरोना पासून गाव खेडे वाचविली होती. मात्र या दुसऱ्या लाटेने सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागात बसत आहे. या लाटेत नागरिकांचा गलथान कारभार सह प्रशासन ची हेतुपुरस्सर डोळेझाक ही कारणीभूत ठरत आहे.