शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

पीक विमा उतरला कागदावरच

By admin | Updated: July 12, 2014 00:38 IST

राज्यातील काही जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली.

अमरावती : राज्यातील काही जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली. या योजनेत त्रुटी असल्यामुळे यावर्षी राज्यभर राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. सोयाबीनसह १६ पिकांसाठी ही योजना आहे. मात्र नुकसान भरपाई निश्चित करण्याचे निकष बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन भरपाई देण्यात येणार आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०१४-१५ या वर्षासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवण्यात परवानगी दिली आहे. या योजनेचा कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना आपला विमा प्रस्ताव संबंधित बँकेत सादर करावा लागणार आहे. उपपिकासाठी ८० टक्के आणि सोयाबीन, कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ, सूर्यफूल, कांदा, बाजरी धान, मका, नाचनी या पिकांसाठी ६० टक्के नुकसान ग्राह्य धरले जाणार आहे. या जोखीम स्तरानुसारच मदतीचे वाटप होईल, असे अध्यादेशात म्हटले आहे. अल्प व अत्यल्प भुधारकांना योजनेत १० टक्के अनुदानाची विशेष सवलत दिली आहे. २०१३ मध्ये पिक विमा योजनेत राज्यभरातील १४ लाख शेतकऱ्यांना ८७ कोटी ८६ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. मागील वर्षी चुकीच्या निकषामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. फळबागांसाठी हेक्टरी ३६०० रुपयांचा विमा आहे. शेतकरी आणि राज्य शासनाचे प्रत्येकी ३६०० रुपये असा ७हजार २०० रुपयाचा विमा आहे. पावसात, गारपिटीत नुकसान होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. गारपीटग्रस्तांसाठी निधी मिळाला; मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत फळबागधारकांना पंचनाम्यात बाद केल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी पिंकाचा आणि फळबागांचा विमा उतरविल्यानंतर वेगवेगळ्या निकषात त्यांना डावलण्यात येते. त्यामुळे विमा कंपन्या आणि बँकाचा फायदा झाला अशी ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.