शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा उतरला कागदावरच

By admin | Updated: July 12, 2014 00:38 IST

राज्यातील काही जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली.

अमरावती : राज्यातील काही जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली. या योजनेत त्रुटी असल्यामुळे यावर्षी राज्यभर राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. सोयाबीनसह १६ पिकांसाठी ही योजना आहे. मात्र नुकसान भरपाई निश्चित करण्याचे निकष बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन भरपाई देण्यात येणार आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०१४-१५ या वर्षासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवण्यात परवानगी दिली आहे. या योजनेचा कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना आपला विमा प्रस्ताव संबंधित बँकेत सादर करावा लागणार आहे. उपपिकासाठी ८० टक्के आणि सोयाबीन, कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ, सूर्यफूल, कांदा, बाजरी धान, मका, नाचनी या पिकांसाठी ६० टक्के नुकसान ग्राह्य धरले जाणार आहे. या जोखीम स्तरानुसारच मदतीचे वाटप होईल, असे अध्यादेशात म्हटले आहे. अल्प व अत्यल्प भुधारकांना योजनेत १० टक्के अनुदानाची विशेष सवलत दिली आहे. २०१३ मध्ये पिक विमा योजनेत राज्यभरातील १४ लाख शेतकऱ्यांना ८७ कोटी ८६ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. मागील वर्षी चुकीच्या निकषामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. फळबागांसाठी हेक्टरी ३६०० रुपयांचा विमा आहे. शेतकरी आणि राज्य शासनाचे प्रत्येकी ३६०० रुपये असा ७हजार २०० रुपयाचा विमा आहे. पावसात, गारपिटीत नुकसान होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. गारपीटग्रस्तांसाठी निधी मिळाला; मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत फळबागधारकांना पंचनाम्यात बाद केल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी पिंकाचा आणि फळबागांचा विमा उतरविल्यानंतर वेगवेगळ्या निकषात त्यांना डावलण्यात येते. त्यामुळे विमा कंपन्या आणि बँकाचा फायदा झाला अशी ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.