शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पीक विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, अंबानींसाठी

By admin | Updated: May 28, 2017 00:05 IST

‘अच्छे दिन येणार’ असे केंद्रातील भाजपा सरकार सर्वसामान्यांसह, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात उद्योगपतींसी यांचे हितसंबंध जुळलेले आहेत.

वीरेंद्र जगताप : मोदी सरकारच्या अच्छे दिनाची काँग्रेसद्वारा पुण्यतिथीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘अच्छे दिन येणार’ असे केंद्रातील भाजपा सरकार सर्वसामान्यांसह, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात उद्योगपतींसी यांचे हितसंबंध जुळलेले आहेत. पंतप्रधान पीक विम्यासाठी १८ हजार कोटींचा हिस्सा शेतकऱ्यांनी भरणा केला. प्रत्यक्षात त्यांच्या पदरी दोन हजार कोटीच पडले. हा विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर अंबानींसाठी असल्याचा घणाघाती आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झालीत. मात्र सर्वसामान्यांच्या पदरी ‘बुरे दिन’ आलेत. या सरकारद्वारा सत्तेपूर्वी व सत्तेत आल्यावर आश्वासनांची पूर्तता नाही. केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा केंद्र शासनाच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी करण्यात आली.आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोप आ.जगताप यांनी केला. प्रत्यक्षात १० हजार रूपये क्विंटल असलेली तूर आता मातीमोल दराने विकली जात आहे. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा सरचिटणीस प्रकाश काळबांडे, भैयासाहेब मेटकर, प्रल्हादराव ठाकरे आदी उपस्थित होते. अमरावती शहर काँग्रेसनेही पत्रकार परिषदेदरम्यान मोदी सरकारचा निषेध केला.मोदी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला हारार्पणसर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारचे प्रतिकात्मक बॅनर तयार करून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या बॅनरला हारार्पण करून पुण्यतिथी साजरी केली आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.