शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

भातकुली तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

टाकरखेडा संभु : भातकुली तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना पावसाने बारा ते पंधरा दिवसांपासून दडी ...

टाकरखेडा संभु :

भातकुली तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना पावसाने बारा ते पंधरा दिवसांपासून दडी मारलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव कासावीस झाला असून, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात पाऊस बरसला नाहीतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर्षी आधीच मान्सून बरसला. त्यामुळे शेतकरी चांगला सुखावला आणि जुलैपासून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. भातकुली तालुक्यात आतापर्यंत ७० टक्के पेरणी झालेली आहे. सुरुवातीला चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारली आहे. दहा ते बारा दिवसांपासून भातकुली तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात कापसाची सर्वाधिक १०२ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. त्यापाठोपाठ सोयाबीनची ६५, तुरीची ६२ टक्के, मूग २५ टक्के, उडीद ७१ टक्के, ज्वारी १५ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. अशातच आता दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. आठ दिवसात दमदार पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

080721\img-20210708-wa0049.jpg

टाकरखेडा संभु येथील शेतकरी पेरणी करीत आहे