शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कोविड १९ च्या उपचारासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी स्वंतत्र केंद्र निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:08 IST

अमरावती : हल्ली कोरोनाचा हैदोस वाढत आहे. त्यामुळे संक्रमित रुग्ण, मृत्युसंख्या दरदिवशी रेकॉर्ड नोंदवित आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या ...

अमरावती : हल्ली कोरोनाचा हैदोस वाढत आहे. त्यामुळे संक्रमित रुग्ण, मृत्युसंख्या दरदिवशी रेकॉर्ड नोंदवित आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या उपचारासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक, कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी स्वंतत्र कोविड केंद्र निर्माण करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंड्या यांना दिलेल्या निवदेनानुसार, जिल्हा परिषदेचे शिक्षक, कर्मचारी व अधिकारी हे वेगवेगळ्या स्तरावर कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अशावेळी एखाद्याला कोरोना संक्रमण झाल्यास त्यांना वैद्यकीय उपचारासह ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पुरेशी सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे बरेचशे शिक्षक व कर्मचारी कोविडमुळे मृत्युमुखी पडले आहे. परिणामी जिल्हा परिषदेने कोविड केंद्र स्थापन करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

कोविड सेंटर स्थापन करण्याकरिता आरोग्य विभाग जि.प. यांचे नियंत्रणात फक्त जिल्हा परिषद शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषदेचे स्वतंत्र कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे, ऑक्सिजन व्हेंटिलेटर व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात खरेदी करण्यात यावे. सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची नियंत्रण समिती गठित करावी. यासाठी स्वतंत्र कोविड १९ उपचार कक्षाकरिता शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे आणि या ठिकाणी फक्त जि.प. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर उपचार करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शहरात अनेक शासकीय इमारती भौतिक सुविधांसह उपलब्ध आहेत. या ठिकाणी कोविड सेंटर स्थापन करता येईल.

जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची आर्थिक मदत घेण्यात यावी. जि.प.ने हा स्तुत्य उपक्रम राबवावा, अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे. ही मागणी मान्य करण्याची शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, कार्याध्यक्ष मनीष काळे, राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर, महिला आघाडीप्रमुख सरिता काठोळे, सरचिटणीस योगिता जिरापुरे, कार्याध्यक्ष सुषमा वानखडे, कोषाध्यक्ष भावना ठाकरे,राज्य महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे यांनी केली आहे.