शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

सीपींनी घेतला पोलीस अधिकाऱ्यांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

अमरावती : पाच दिवसांत तिघांचे खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सोमवारी ठाणेदार व अन्य पोलीस ...

अमरावती : पाच दिवसांत तिघांचे खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सोमवारी ठाणेदार व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी योग्यरीतीने पार पाडा, नाकाबंदी वाढवा आणि त्यात संशयितांच्या दुचाकीच्या डिक्कीची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात या सूचना देण्यात आल्या. अलीकडच्या काळात झालेल्या घटनांमध्ये चायना चाकूचा वापर करण्यात आला. ते चाकू ‘डोमेस्टिक’मध्ये मोडतात. ते चाकू आर्म्स ॲक्ट या संज्ञेमध्ये बसत नाहीत. मात्र, ते ऑनलाईन बोलावले जातात. त्यावर अंकुश लावण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले. चायना चाकूच्या ऑनलाईन विक्रीला कशाप्रकारे प्रतिबंध घालता येईल, त्याबाबतही सूचना करण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने स्लम एरियातील दारूवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बार, हॉटेल रडारवर

बार, हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा असली तरी होम डिलिव्हरीसाठी आपण हॉटेल, बार ९ वाजेपर्यंत उघडे ठेवत असल्याची सबब हॉटेल, बारचालकांनी दिली आहे. त्यामुळे दुपारी ४ नंतर कुठल्या हॉटेलमध्ये जेवण सर्व्ह तर केले जात नाही ना, ते पाहण्यासोबतच रात्री ९ नंतर कुठल्याही स्थितीत बार, हॉटेल सुरू दिसायला नकोत, असे कडक निर्देश देण्यात आले. दरम्यान, २३ जुलै रोजी रात्री ११ वाजता ज्या मराठा दरबार ढाब्यावर खून झाला, तो ढाबा ३० दिवसांसाठी सील करण्यात आला. महापालिकेने सीलची कारवाई अधिक दिवसांसाठी करावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या.