शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सीपींनी घेतला पोलीस अधिकाऱ्यांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

अमरावती : पाच दिवसांत तिघांचे खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सोमवारी ठाणेदार व अन्य पोलीस ...

अमरावती : पाच दिवसांत तिघांचे खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सोमवारी ठाणेदार व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी योग्यरीतीने पार पाडा, नाकाबंदी वाढवा आणि त्यात संशयितांच्या दुचाकीच्या डिक्कीची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात या सूचना देण्यात आल्या. अलीकडच्या काळात झालेल्या घटनांमध्ये चायना चाकूचा वापर करण्यात आला. ते चाकू ‘डोमेस्टिक’मध्ये मोडतात. ते चाकू आर्म्स ॲक्ट या संज्ञेमध्ये बसत नाहीत. मात्र, ते ऑनलाईन बोलावले जातात. त्यावर अंकुश लावण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले. चायना चाकूच्या ऑनलाईन विक्रीला कशाप्रकारे प्रतिबंध घालता येईल, त्याबाबतही सूचना करण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने स्लम एरियातील दारूवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बार, हॉटेल रडारवर

बार, हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा असली तरी होम डिलिव्हरीसाठी आपण हॉटेल, बार ९ वाजेपर्यंत उघडे ठेवत असल्याची सबब हॉटेल, बारचालकांनी दिली आहे. त्यामुळे दुपारी ४ नंतर कुठल्या हॉटेलमध्ये जेवण सर्व्ह तर केले जात नाही ना, ते पाहण्यासोबतच रात्री ९ नंतर कुठल्याही स्थितीत बार, हॉटेल सुरू दिसायला नकोत, असे कडक निर्देश देण्यात आले. दरम्यान, २३ जुलै रोजी रात्री ११ वाजता ज्या मराठा दरबार ढाब्यावर खून झाला, तो ढाबा ३० दिवसांसाठी सील करण्यात आला. महापालिकेने सीलची कारवाई अधिक दिवसांसाठी करावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या.