शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गाईचे दूध अमृत की विष ?

By admin | Updated: December 7, 2015 04:45 IST

शहरात फिरणाऱ्या मोकाट गाई उकिरडे फुंकत असल्यामुळे आता गाईचे दूध मानवी जीवनासाठी अमृत की विष, असा प्रश्न

वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीशहरात फिरणाऱ्या मोकाट गाई उकिरडे फुंकत असल्यामुळे आता गाईचे दूध मानवी जीवनासाठी अमृत की विष, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गायी घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणच्या अन्नपदार्थ ताव मारत असल्यामुळे आता दुधातूनही मानवी जीवनात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन व जनावर मालकांच्या निष्काळजीपणामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यभरात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. गोहत्या बंदीच्या आदेशाचे सर्वत्र पालन केले गेले. मात्र, आता गो-पालनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरात शेकडो गाई मोकाट फिरताना आढळून येत आहेत. विशेष म्हणजे या गाई उकिरडे फुंकताना आढळून येत आहे. घाण व अस्वच्छतेमधील अन्नपदार्थ खाताना आढळून येत आहे. आधीच शहरात स्वच्छतेचा अभाव आहे. ठिकठिकाणी घाण, कचरा व प्लास्टिक पन्नी दिसून येत आहे. त्यातच गाई उकिरड्यावरील अन्नपदार्थ खात असल्यामुळे त्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 'लोकमत'ने केलेल्या सर्वेक्षणातून शहरातील अनेक ठिकाणी गाई घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणी पडलेले अन्नपदार्थ खाताना दिसून आल्या आहेत. गाईचे दूध मानवी जीवनासाठी पोषक आहे. मात्र, जर गाय दूषित जागेवरील अन्नपदार्थ खात असेल, तर त्याचा परिणाम मानवी जीवनावर होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता गाईच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश गाईंचे मालक गार्इंना मोकाट सोडून देतात. परिणामी त्या शहरातील उकिरडे फुंकून पोट भरतात. वैद्यकीय घनकचऱ्यातही शोधतात अन्न शहरातील बहुतांश रुग्णालयांत वैद्यकीय घनकचऱ्यांची विल्हेवाट योग्यरीतीने लावण्यात येते. मात्र, काही रुग्णालये अद्यापही घनकचरा सार्वजनिक ठिकाणाच्या कचरा कुंडीत टाकतात. अनेकदा गाई वैद्यकीय घनकचऱ्यांतही अन्न पदार्थ शोधताना आढळून आल्या आहेत. इर्विन रुग्णालयातील काही घनकचरा रेल्वे स्थानकांच्या भिंतीशेजारी टाकण्यात आला आहे. तेथे शुक्रवारी रात्री १० वाजता एक गाय वैद्यकीय कचऱ्यात टाकलेले अन्नपदार्थ खात असताना आढळून आली आहे. ही बाब मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारीच आहे.

वैद्यकीय घनकचरा, घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणचे अन्नपदार्थ खाल्यास गाय आजारी पडू शकते. त्या गाईचे दूध नागरिकांच्या पिण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यातच गाई प्लास्टिक पन्नी खातात. त्यांच्या पोटात प्लास्टिकचे विघटन होत नाही. अशा स्थितीत तीन ते चार महिन्यांत गाय दगावते. त्यामुळे नागरिकांनी दूध घेताना गायीला काही आजार आहे का, यांची विचारणा केली पाहिजे. - सचिन बोन्द्रे, सहायक पशुशल्य चिकित्सक, महापालिका.