शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

गाईचे दूध अमृत की विष ?

By admin | Updated: December 7, 2015 04:45 IST

शहरात फिरणाऱ्या मोकाट गाई उकिरडे फुंकत असल्यामुळे आता गाईचे दूध मानवी जीवनासाठी अमृत की विष, असा प्रश्न

वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीशहरात फिरणाऱ्या मोकाट गाई उकिरडे फुंकत असल्यामुळे आता गाईचे दूध मानवी जीवनासाठी अमृत की विष, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गायी घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणच्या अन्नपदार्थ ताव मारत असल्यामुळे आता दुधातूनही मानवी जीवनात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन व जनावर मालकांच्या निष्काळजीपणामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यभरात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. गोहत्या बंदीच्या आदेशाचे सर्वत्र पालन केले गेले. मात्र, आता गो-पालनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरात शेकडो गाई मोकाट फिरताना आढळून येत आहेत. विशेष म्हणजे या गाई उकिरडे फुंकताना आढळून येत आहे. घाण व अस्वच्छतेमधील अन्नपदार्थ खाताना आढळून येत आहे. आधीच शहरात स्वच्छतेचा अभाव आहे. ठिकठिकाणी घाण, कचरा व प्लास्टिक पन्नी दिसून येत आहे. त्यातच गाई उकिरड्यावरील अन्नपदार्थ खात असल्यामुळे त्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 'लोकमत'ने केलेल्या सर्वेक्षणातून शहरातील अनेक ठिकाणी गाई घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणी पडलेले अन्नपदार्थ खाताना दिसून आल्या आहेत. गाईचे दूध मानवी जीवनासाठी पोषक आहे. मात्र, जर गाय दूषित जागेवरील अन्नपदार्थ खात असेल, तर त्याचा परिणाम मानवी जीवनावर होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता गाईच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश गाईंचे मालक गार्इंना मोकाट सोडून देतात. परिणामी त्या शहरातील उकिरडे फुंकून पोट भरतात. वैद्यकीय घनकचऱ्यातही शोधतात अन्न शहरातील बहुतांश रुग्णालयांत वैद्यकीय घनकचऱ्यांची विल्हेवाट योग्यरीतीने लावण्यात येते. मात्र, काही रुग्णालये अद्यापही घनकचरा सार्वजनिक ठिकाणाच्या कचरा कुंडीत टाकतात. अनेकदा गाई वैद्यकीय घनकचऱ्यांतही अन्न पदार्थ शोधताना आढळून आल्या आहेत. इर्विन रुग्णालयातील काही घनकचरा रेल्वे स्थानकांच्या भिंतीशेजारी टाकण्यात आला आहे. तेथे शुक्रवारी रात्री १० वाजता एक गाय वैद्यकीय कचऱ्यात टाकलेले अन्नपदार्थ खात असताना आढळून आली आहे. ही बाब मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारीच आहे.

वैद्यकीय घनकचरा, घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणचे अन्नपदार्थ खाल्यास गाय आजारी पडू शकते. त्या गाईचे दूध नागरिकांच्या पिण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यातच गाई प्लास्टिक पन्नी खातात. त्यांच्या पोटात प्लास्टिकचे विघटन होत नाही. अशा स्थितीत तीन ते चार महिन्यांत गाय दगावते. त्यामुळे नागरिकांनी दूध घेताना गायीला काही आजार आहे का, यांची विचारणा केली पाहिजे. - सचिन बोन्द्रे, सहायक पशुशल्य चिकित्सक, महापालिका.