शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

गाईचे दूध अमृत की विष ?

By admin | Updated: December 7, 2015 04:45 IST

शहरात फिरणाऱ्या मोकाट गाई उकिरडे फुंकत असल्यामुळे आता गाईचे दूध मानवी जीवनासाठी अमृत की विष, असा प्रश्न

वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीशहरात फिरणाऱ्या मोकाट गाई उकिरडे फुंकत असल्यामुळे आता गाईचे दूध मानवी जीवनासाठी अमृत की विष, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गायी घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणच्या अन्नपदार्थ ताव मारत असल्यामुळे आता दुधातूनही मानवी जीवनात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन व जनावर मालकांच्या निष्काळजीपणामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यभरात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. गोहत्या बंदीच्या आदेशाचे सर्वत्र पालन केले गेले. मात्र, आता गो-पालनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरात शेकडो गाई मोकाट फिरताना आढळून येत आहेत. विशेष म्हणजे या गाई उकिरडे फुंकताना आढळून येत आहे. घाण व अस्वच्छतेमधील अन्नपदार्थ खाताना आढळून येत आहे. आधीच शहरात स्वच्छतेचा अभाव आहे. ठिकठिकाणी घाण, कचरा व प्लास्टिक पन्नी दिसून येत आहे. त्यातच गाई उकिरड्यावरील अन्नपदार्थ खात असल्यामुळे त्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 'लोकमत'ने केलेल्या सर्वेक्षणातून शहरातील अनेक ठिकाणी गाई घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणी पडलेले अन्नपदार्थ खाताना दिसून आल्या आहेत. गाईचे दूध मानवी जीवनासाठी पोषक आहे. मात्र, जर गाय दूषित जागेवरील अन्नपदार्थ खात असेल, तर त्याचा परिणाम मानवी जीवनावर होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता गाईच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश गाईंचे मालक गार्इंना मोकाट सोडून देतात. परिणामी त्या शहरातील उकिरडे फुंकून पोट भरतात. वैद्यकीय घनकचऱ्यातही शोधतात अन्न शहरातील बहुतांश रुग्णालयांत वैद्यकीय घनकचऱ्यांची विल्हेवाट योग्यरीतीने लावण्यात येते. मात्र, काही रुग्णालये अद्यापही घनकचरा सार्वजनिक ठिकाणाच्या कचरा कुंडीत टाकतात. अनेकदा गाई वैद्यकीय घनकचऱ्यांतही अन्न पदार्थ शोधताना आढळून आल्या आहेत. इर्विन रुग्णालयातील काही घनकचरा रेल्वे स्थानकांच्या भिंतीशेजारी टाकण्यात आला आहे. तेथे शुक्रवारी रात्री १० वाजता एक गाय वैद्यकीय कचऱ्यात टाकलेले अन्नपदार्थ खात असताना आढळून आली आहे. ही बाब मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारीच आहे.

वैद्यकीय घनकचरा, घाण व अस्वच्छतेच्या ठिकाणचे अन्नपदार्थ खाल्यास गाय आजारी पडू शकते. त्या गाईचे दूध नागरिकांच्या पिण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यातच गाई प्लास्टिक पन्नी खातात. त्यांच्या पोटात प्लास्टिकचे विघटन होत नाही. अशा स्थितीत तीन ते चार महिन्यांत गाय दगावते. त्यामुळे नागरिकांनी दूध घेताना गायीला काही आजार आहे का, यांची विचारणा केली पाहिजे. - सचिन बोन्द्रे, सहायक पशुशल्य चिकित्सक, महापालिका.