शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

कापूस @ ४५०० रुपये

By admin | Updated: April 19, 2015 00:07 IST

शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची विक्री झाल्यानंतर कापसाच्या भावात गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली.

हंगाम सरला : शेतकऱ्यांचा माल नाही, व्यापाऱ्यांचाच फायदाअमरावती : शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची विक्री झाल्यानंतर कापसाच्या भावात गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली. हंगाम संपताना शेतकऱ्याजवळ कापूस नाही. त्यामुळे सद्यस्थितीत विकला जाणारा माल व्यापाऱ्यांचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सरकी व रूई यांचे भाव वधारल्याचे दर्शवून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. जिल्ह्यात पणन महासंघ व सीसीआयद्वारा कापसाची खरेदी करण्यात आली. या दोन्ही विभागांद्वारा कापसाचा हमीभाव ४०५० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात आली. ही केंद्रे जिल्ह्यात अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी ३२०० ते ३७०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला. आधीच कर्जबाजारी व अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच व्यापाऱ्यांना कापूस विकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला आहे. कापसाची शासकीय खरेदी बंद झाली आहे व कापसाचा हंगाम संपला आहे. त्यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. अशी होत आहे भाववाढचालू महिन्यात १ एप्रिलपासून सोयाबीनसह तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. ३१ मार्चला सोयाबीनचे भाव ३१०० रूपये प्रति क्विंटल होते. १५ एप्रिलला ३४५० रूपये प्रति क्विंटल आहेत. तुरीचे भाव ५०० रूपयांनी वाढून ६५०० रूपये प्रति क्विंटल झाले आहेत. हरभरा ३२०० रूपयांवरून ३८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. अशी होत आहे भाववाढचालू महिन्यात १ एप्रिलपासून सोयाबीनसह तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. ३१ मार्चला सोयाबीनचे भाव ३१०० रूपये प्रति क्विंटल होते. १५ एप्रिलला ३४५० रूपये प्रति क्विंटल आहेत. तुरीचे भाव ५०० रूपयांनी वाढून ६५०० रूपये प्रति क्विंटल झाले आहेत. हरभरा ३२०० रूपयांवरून ३८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे.