शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

महापालिकेचा ‘तो’ ठराव शासनाकडून विखंडित

By admin | Updated: May 6, 2016 00:12 IST

तेराव्या वित्त आयोगातून महापालिकेला मिळालेला निधी नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख असा वितरित करावा, ...

अमरावती : तेराव्या वित्त आयोगातून महापालिकेला मिळालेला निधी नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख असा वितरित करावा, त्यानुसार कामे सुचवावित, असा महासभेने केलेला ठराव राज्य शासनाने अखेरीस विखंडित केला. २० जुलै२०१५ च्या सर्वसाधारण सभेत पारित केलेला हा ठराव विखंडित करावा, अशी विनंती महापालिका प्रशासनाकडून नगरविकास विभागाला करण्यात आली होती.१३ व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून कामे करण्यासाठी कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर प्रशासनाने बाजू सुद्धा मांडली. मात्र प्रस्तावित कामे निश्चित न करता या निधीतून प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपयांचा निधी देण्यात यावा व कामे सुचवावीत, असा ठराव आमसभेने घेतला. मात्र हा ठराव शासनाच्या मार्गदर्शक तत्वात बसणारा नसल्याने रद्द करण्यात यावा, अशी विनंती महापालिका आयुक्तांनी केली होती. त्यावर गुरुवारी अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या १२/८/२०१५ च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुलक्षून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. ६६ दिनांक २० जुलै २०१५ तात्पुरता निलंबित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने उप आयुक्त (प्रशासन) यांनी वित्त आयोगाच्या निधीतून करावयाच्या कामाची यादी तयार करून शासनास अवलोकनार्थ सादर केलेली होती व आयुक्तांनी त्यांचे अभिवेदन सादर केले. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेच्या २० जुलै १५ ला झालेल्या महासभेने पारित केलेला ठराव क्र. ६६ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण अठ्ठावीस कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडीत करण्यात यावा, असे अभिवेदन आयुक्तांनी केले होते. त्या अभिवेदनाच्या आधारे अमरावती महानगरपालिका, महासभा ठराव क्र. ६६ दि. २०/७/२०१५ हा अंतिमत: विखंडीत करण्याचा निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन होता. त्या अनुषंगाने तो ठराव विखंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)असा आहे शासन निर्णय१३ व्या वित्त आयोगांतर्गत महापालिकांना वाटप करण्यात आलेल्या निधीचा विनियोग शासन निर्णय, नगरविकास विभाग, क्र. तेविआ-२०१०/प्र.क्र. १३१/२०१०/नवि-४, दिनांक २५ आॅक्टोबर २०१० मध्ये नमूद विहीत कार्यपद्धतीनुसारच करणे आवश्यक असल्याने अमरावती महानगरपालिका सर्वसाधारण सभेने पारित केलेले ठराव क्र. ६६ दिनांक २०/७/२०१५ हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडित झाल्याचे मानण्यात येत आहे, असा शासन आदेश गुरुवारी नगरविकास विभागाने काढला आहे. या शासन आदेशाने प्रत्येक नगरसेवकांना २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव रद्द करण्यात आला, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.