शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

महापालिकेचा ‘तो’ ठराव शासनाकडून विखंडित

By admin | Updated: May 6, 2016 00:12 IST

तेराव्या वित्त आयोगातून महापालिकेला मिळालेला निधी नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख असा वितरित करावा, ...

अमरावती : तेराव्या वित्त आयोगातून महापालिकेला मिळालेला निधी नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख असा वितरित करावा, त्यानुसार कामे सुचवावित, असा महासभेने केलेला ठराव राज्य शासनाने अखेरीस विखंडित केला. २० जुलै२०१५ च्या सर्वसाधारण सभेत पारित केलेला हा ठराव विखंडित करावा, अशी विनंती महापालिका प्रशासनाकडून नगरविकास विभागाला करण्यात आली होती.१३ व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून कामे करण्यासाठी कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर प्रशासनाने बाजू सुद्धा मांडली. मात्र प्रस्तावित कामे निश्चित न करता या निधीतून प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपयांचा निधी देण्यात यावा व कामे सुचवावीत, असा ठराव आमसभेने घेतला. मात्र हा ठराव शासनाच्या मार्गदर्शक तत्वात बसणारा नसल्याने रद्द करण्यात यावा, अशी विनंती महापालिका आयुक्तांनी केली होती. त्यावर गुरुवारी अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या १२/८/२०१५ च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुलक्षून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. ६६ दिनांक २० जुलै २०१५ तात्पुरता निलंबित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने उप आयुक्त (प्रशासन) यांनी वित्त आयोगाच्या निधीतून करावयाच्या कामाची यादी तयार करून शासनास अवलोकनार्थ सादर केलेली होती व आयुक्तांनी त्यांचे अभिवेदन सादर केले. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेच्या २० जुलै १५ ला झालेल्या महासभेने पारित केलेला ठराव क्र. ६६ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण अठ्ठावीस कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडीत करण्यात यावा, असे अभिवेदन आयुक्तांनी केले होते. त्या अभिवेदनाच्या आधारे अमरावती महानगरपालिका, महासभा ठराव क्र. ६६ दि. २०/७/२०१५ हा अंतिमत: विखंडीत करण्याचा निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन होता. त्या अनुषंगाने तो ठराव विखंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)असा आहे शासन निर्णय१३ व्या वित्त आयोगांतर्गत महापालिकांना वाटप करण्यात आलेल्या निधीचा विनियोग शासन निर्णय, नगरविकास विभाग, क्र. तेविआ-२०१०/प्र.क्र. १३१/२०१०/नवि-४, दिनांक २५ आॅक्टोबर २०१० मध्ये नमूद विहीत कार्यपद्धतीनुसारच करणे आवश्यक असल्याने अमरावती महानगरपालिका सर्वसाधारण सभेने पारित केलेले ठराव क्र. ६६ दिनांक २०/७/२०१५ हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडित झाल्याचे मानण्यात येत आहे, असा शासन आदेश गुरुवारी नगरविकास विभागाने काढला आहे. या शासन आदेशाने प्रत्येक नगरसेवकांना २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव रद्द करण्यात आला, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.