शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोना, मोबाईल वेडाने उडविली झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यापासून असणारी कोरोना सदृश स्थिती, यामुळे सतत घरात राहावे लागत असल्याने नागरिकांचे मोबाईलवेड वाढले आहे. ...

अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यापासून असणारी कोरोना सदृश स्थिती, यामुळे सतत घरात राहावे लागत असल्याने नागरिकांचे मोबाईलवेड वाढले आहे. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

निरोगी आयुष्यासाठी झोप महत्त्वाची आहे. नाहीतर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. निद्रानाश, चिंता तणाव, विनाकारणची चिडचीड यासह अन्य समस्या उद्भवतात. तसे पाहता प्रत्येकाला झोप ही एकप्रकारची प्राथमिक गरजच आहे. झोप आणि मेंदू परस्स्पराशी निगडीत आहेत. त्यामुळे झोप चांगली झाल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते, याउलट झोप न झाल्यास चिडचीड वाढते. बदलत्या जीवनशैलीत झोप कमी होत असल्याने अनेकांना विकार जडावत आहेत.

एकवेळ निद्रानाश आजार जडावला की पाठोपाठ आजारांचे सत्र सुरू होतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी पुरेसी झोप घेणे महत्त्वाचे आहे. प्रसंगी कधी तणावाचे प्रसंग येतात. मात्र, या काळात सकारात्मक राहून पुरेसी झोप घ्यावी. अलीकडे तरुणाई मोबाईलवेडी झालेली आहे. याशिवाय कोरोना संसर्गामुळे सर्व क्लाॅसेसदेखील ऑनलाईन आहे. त्यामुळे याकाळात अभ्यासासोबत पुरेशी झोपही महत्त्वाची असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

बॉक्स

कमी झोपेचे दुष्परिणाम

* झोप कमी झाल्यास चिडचीड वाढते

* दिनचर्या बिघडते, ॲसीडिटी वाढते

* मानसिक व शारीरिक थकवा जाणवतो

* बीपी, शुगरसारखे आजार जडतात

बॉक्स

झोप का उडते?

* चिंता, तणाव, जीवनशैलीतील बदल आदी कारणांनी निद्रानाश आजार जडतात.

* सतत मोबाईलवर राहिल्याने निद्रानाश होतो व त्यामुळे पुन्हा मोबाईल हाती घेतला जातो.

* मोबाईल किंवा टीव्ही स्क्रिनला सतत खिळून बसल्याने निद्रानाश आजार बळावतो.

* चिंता, उदासिनता, व्यसनाधिनता, आजारपण जवळच्या व्यक्तीचा मृत्यूमुळे झोप उडते.

बॉक्स

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

* झोप न लागल्याने त्याचे वाईट परिणाम शरिरावर होतात. त्यामुळे नागरिक स्वत:हून झोपेच्या गोळ्या घेतात. अशा गोळ्या आरोग्यासाठी चिंताजनक आहेत.

* या गोळ्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मनाची निर्णयक्षमता कमी होते व त्याचा शरीरावर परिणाम होतो.

-----

*झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत व गाने ऐकावे

* नियमित व्यायाम करावा व सकस आहार घ्यावा

* ताणतणाव नसावा, यासाठी एखादा छंद जोपासावा

* झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवून वाचन करावे

पाईंटर

नेमकी झोप किती हवी

नवजात बाळ :

एक ते पाच वर्ष : १२ ते १५ तास

शाळेत जाणारी मुले : १० ते १२ तास

२१ ते ४० वर्षे : ०८ ते १० तास

४१ ते ६० वर्ष : ०७ ते ०८ तास

६१ पेक्षा जास्त : ०६ ते ०८ तास

कोट

कोरोना काळात मोबाईलवेड वाढले व वाचन कमी झाले. यासह अनेक कारणांमुळे निद्रानाश जडावतो. पुरेसी झोप न झाल्यास चिडचीड होते व इतरही व्याधी जडावतात व पचनक्रियेवरही परिणाम होतो.

- डॉ मंगेश काळे,