शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, मोबाईल वेडाने उडविली झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यापासून असणारी कोरोना सदृश स्थिती, यामुळे सतत घरात राहावे लागत असल्याने नागरिकांचे मोबाईलवेड वाढले आहे. ...

अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यापासून असणारी कोरोना सदृश स्थिती, यामुळे सतत घरात राहावे लागत असल्याने नागरिकांचे मोबाईलवेड वाढले आहे. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

निरोगी आयुष्यासाठी झोप महत्त्वाची आहे. नाहीतर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. निद्रानाश, चिंता तणाव, विनाकारणची चिडचीड यासह अन्य समस्या उद्भवतात. तसे पाहता प्रत्येकाला झोप ही एकप्रकारची प्राथमिक गरजच आहे. झोप आणि मेंदू परस्स्पराशी निगडीत आहेत. त्यामुळे झोप चांगली झाल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते, याउलट झोप न झाल्यास चिडचीड वाढते. बदलत्या जीवनशैलीत झोप कमी होत असल्याने अनेकांना विकार जडावत आहेत.

एकवेळ निद्रानाश आजार जडावला की पाठोपाठ आजारांचे सत्र सुरू होतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी पुरेसी झोप घेणे महत्त्वाचे आहे. प्रसंगी कधी तणावाचे प्रसंग येतात. मात्र, या काळात सकारात्मक राहून पुरेसी झोप घ्यावी. अलीकडे तरुणाई मोबाईलवेडी झालेली आहे. याशिवाय कोरोना संसर्गामुळे सर्व क्लाॅसेसदेखील ऑनलाईन आहे. त्यामुळे याकाळात अभ्यासासोबत पुरेशी झोपही महत्त्वाची असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

बॉक्स

कमी झोपेचे दुष्परिणाम

* झोप कमी झाल्यास चिडचीड वाढते

* दिनचर्या बिघडते, ॲसीडिटी वाढते

* मानसिक व शारीरिक थकवा जाणवतो

* बीपी, शुगरसारखे आजार जडतात

बॉक्स

झोप का उडते?

* चिंता, तणाव, जीवनशैलीतील बदल आदी कारणांनी निद्रानाश आजार जडतात.

* सतत मोबाईलवर राहिल्याने निद्रानाश होतो व त्यामुळे पुन्हा मोबाईल हाती घेतला जातो.

* मोबाईल किंवा टीव्ही स्क्रिनला सतत खिळून बसल्याने निद्रानाश आजार बळावतो.

* चिंता, उदासिनता, व्यसनाधिनता, आजारपण जवळच्या व्यक्तीचा मृत्यूमुळे झोप उडते.

बॉक्स

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

* झोप न लागल्याने त्याचे वाईट परिणाम शरिरावर होतात. त्यामुळे नागरिक स्वत:हून झोपेच्या गोळ्या घेतात. अशा गोळ्या आरोग्यासाठी चिंताजनक आहेत.

* या गोळ्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मनाची निर्णयक्षमता कमी होते व त्याचा शरीरावर परिणाम होतो.

-----

*झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत व गाने ऐकावे

* नियमित व्यायाम करावा व सकस आहार घ्यावा

* ताणतणाव नसावा, यासाठी एखादा छंद जोपासावा

* झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवून वाचन करावे

पाईंटर

नेमकी झोप किती हवी

नवजात बाळ :

एक ते पाच वर्ष : १२ ते १५ तास

शाळेत जाणारी मुले : १० ते १२ तास

२१ ते ४० वर्षे : ०८ ते १० तास

४१ ते ६० वर्ष : ०७ ते ०८ तास

६१ पेक्षा जास्त : ०६ ते ०८ तास

कोट

कोरोना काळात मोबाईलवेड वाढले व वाचन कमी झाले. यासह अनेक कारणांमुळे निद्रानाश जडावतो. पुरेसी झोप न झाल्यास चिडचीड होते व इतरही व्याधी जडावतात व पचनक्रियेवरही परिणाम होतो.

- डॉ मंगेश काळे,