शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

जिल्ह्यातील १५६१ पैकी १२८४ गावांत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोनाचा संसर्ग शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. १४ तालुक्यांतील अनेक गावांना कोरोनाने ...

अमरावती : कोरोनाचा संसर्ग शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. १४ तालुक्यांतील अनेक गावांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यातील १५६१ पैकी १२८४ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला, तर २७७ गावांनी कोरोनाला रोखले आहे.

ग्रामीण भागात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पहिल्या लाटेत अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहरातील लोक गावाकडे धाव घेत होते. परंतु, आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला कोरोनाने विळखा घातला. ग्रामीण भागात लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असल्याने आणि कोरोना संसर्ग रोखण्याचे नियम पाळत नसल्याचा हा परिणाम आहे.

मेळघाटात सुरुवातीला कोरोनाचा उद्रेक नव्हता. परंतु, होळीच्या सणानंतर चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांत नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात २८७ ठिकाणे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. या ठिकाणी ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरूड, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन तालुक्यांना मध्य प्रदेशची सीमा जुळली आहे. त्यामुळे तेथील लोकांचा या राज्यातील लोकांशी संपर्क येत असतो. याबाबत प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहेत.