शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व जगापुढे झाले ठळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

(लोगो/दिनविशेष) अमरावती : दरवर्षी ७ एप्रिल जागतिक आरोग्यदिन साजरा होतो. याच दिवशी सन १९४८ साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ...

(लोगो/दिनविशेष)

अमरावती : दरवर्षी ७ एप्रिल जागतिक आरोग्यदिन साजरा होतो. याच दिवशी सन १९४८ साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. ती सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्राची शाखा असून, मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्या घेऊन ही संघटना दरवर्षी एक घोषवाक्य जाहीर करते आणि त्याला अनुसरून वर्षभर कार्यक्रम राबवते. ‘सर्वांसाठी सुसंस्कृत व निरामय जगाची निर्मिती’ असे यंदाचे घोषवाक्य आहे. सार्वजनिक आरोग्याच्या जपणुकीबाबत जगभर सर्वत्र बोलले जाते. त्याकडे अनेक देशांचे दुर्लक्षच होत आले. मात्र, कोरोना साथीने सार्वजनिक आरोग्याच्या जपणुकीचे महत्त्व समस्त जगापुढे ठळक केले, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी जागतिक आरोग्यदिनाच्या पूर्वसंध्येला सांगितले. पहिला जागतिक आरोग्यदिन ७ एप्रिल १९५० रोजी साजरा झाला. आरोग्य, माता आणि बालसंगोपन व पर्यावरणातील बदल अशा विविध विषयांवर जागतिक आरोग्य संघटनेने जनजागृती केली आहे व अनेक देशांना या समस्येवर उपायांची अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच मानसिक आरोग्य, माता व बालमृत्यू कमी करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आदींबाबत अनेक राष्ट्रांकडून तसेच जागतिक पातळीवर विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत.

चांगले आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. कोविड महामारीनिमित्त सार्वजनिक आरोग्य संस्थांचा कायापालट होऊ घातला आहे, जेणेकरून तळागाळातील व्यक्तींसह सर्वांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होईल. जगातील सर्व देशांना हे करणे क्रमप्राप्त आहे. यात नागरिकांच्या सक्रिय सहभागाचीही तेवढीच गरज असणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

आजार नसणे म्हणजे ‘फिट’ असणे असे नाही

चांगले आरोग्य म्हणजे केवळ आजारी किंवा अशक्त नसणे असे नाही. चांगले आरोग्य म्हणजे संपूर्ण शारिरीक, मानसिक आणी सामाजीकरीत्या स्वस्थ असणे होय. तशी व्याख्या आरोग्य संघटनेने केली आहे व गत सात दशकांपासून ही संघटना आरोग्याची खरी व्याख्या प्रत्यक्षात आणण्यासाठी दरवर्षी प्रयत्न करत असल्याचे सीएस म्हणाले

बॉक्स

कोरोनाने दिले धडे

बहुतेक गरीब आणी विकसनशील राष्ट्रे पुरेशा संसाधनांअभावी सार्वजनिक आरोग्यावर मोठा खर्च करू शकत नाहीत ‍किंवा आरोग्य या विषयाला प्राथमिकता दिली जात नाही. मात्र, कोरोनाने आता सर्वांना सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले आहे. सार्वजनिक आरोग्य व आरोग्य संस्थांकडे दुर्लक्ष झाले, तर त्याचे दुष्परिणाम संभवतात. दर १०० वर्षांनी जगात महामारी येते आणि त्यात कोट्यवधी व्यक्ती बाधित होतात, लक्षावधी मृत्युमुखी पडतात, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. त्यामुळे कोरोनानंतर अनेक बदल होत आहेत. आरोग्याला प्राथमिकता मिळून अनेक नव्या गोष्टी उभारल्या जात आहेत.