शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कोरोना, २० दिवस, १९,४९१ रुग्ण, ३५५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात मे महिन्यात कठोर संचारबंदी असतानाही २० दिवसांत १९,४९१ कोरोनाग्रस्त व ३५५ रुग्णांची नोंद झालेली आहे. ...

अमरावती : जिल्ह्यात मे महिन्यात कठोर संचारबंदी असतानाही २० दिवसांत १९,४९१ कोरोनाग्रस्त व ३५५ रुग्णांची नोंद झालेली आहे. या काळात जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी २२ ते २८ टक्क्यांच्या दरम्यान राहिल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ७ मेपासून कठोर संचारबंदीचे आदेश जारी केले आहे. हे एक प्रकारचे लॉकडाऊन असल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित होईल, अशी अपेक्षा असताना जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच राहिला. आतापर्यंतचे कोरोनाग्रस्तांचे उच्चांक याच कालावधीत झालेले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत ५० टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. मृतांची टक्केवारीदेखील याच प्रमाणात असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात १ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या ६६,६९० होती तर २० मे रोजी ८६,१७८ वर पोहोचली आहे. याशिवाय १ मे रोजी ९६६ मृत्यूंची नोंद झाली होती ती आता २० मे पर्यत १३२१ वर पोहोचली आहे. याशिवाय संक्रमनमुक्त नागरिकांची संख्या १ मे रोजी ५७,५९६ होती. ती आता ७५,२८९ वर पोहोचली आहे. एकूण संसर्गाची स्थिती गंभीर असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

बॉक्स

पॉझिटिव्हिटी वाढतीच

जिल्ह्यात तीन दिवसांत संसर्गात काही प्रमाणात कमी आली असली असली तरी आठ तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. यात १७ तारखेला ८७० रुग्ण व २४.४१ टक्के पॉझिटिव्हिटी, १८ तारखेला ७९८ पॉझिटिव्ह व १८.१६ टक्के पॉझिटिव्हिटी, १९ तारखेला ७९१ पॉझिटिव्ह व २२.३३ टक्के पाॅझिटिव्हिटी याशिवाय २० तारखेला ८९७ रुग्ण व २४.८२ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आलेली आहे.

पॉईंटर

कोरोना जिल्हास्थिती

एकूण रुग्ण : ८६,१७८

कोरोनामुक्त : ७५,२८९

एकूण मृत्यू : १,३२१