शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

‘इको टुरिझम’मधून कोरकूंचा विकास

By admin | Updated: September 12, 2015 00:10 IST

इच्छाशक्तीच्या बळावर विपरीत परिस्थितीतही गावाचे रूपडे पालटता येते, याचे ज्वलंत उदाहरण शहानूरच्या अडाणी आणि अशिक्षित आदिवासींनी प्रस्तुत केले आहे.

लोकमत विशेषअमरावती : इच्छाशक्तीच्या बळावर विपरीत परिस्थितीतही गावाचे रूपडे पालटता येते, याचे ज्वलंत उदाहरण शहानूरच्या अडाणी आणि अशिक्षित आदिवासींनी प्रस्तुत केले आहे. दुर्गम मेळघाटच्या कुशीत वसलेल्या शहानूर या आदिवासींच्या गावात ग्राम परिसर विकास समितीमार्फत पर्यटकांच्या सोयीसाठी विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. यातून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. हा आगळावेगळा उपक्रम वनविभागाच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. अकोट तालुकातील शहानूर गावात जेमतेम ८० आदिवासी कुटुंब राहतात. आतापर्यंत येथील आदिवासी अठराविश्वे दारिद्र्यात जीवन जगत होते. मात्र, वनविभागाच्या मदतीने आता ते मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्याने अलीकडे शहानुरात पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. नरनाळा किल्ला, नरनाळा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याची ओढच आता पर्यटकांना लागली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश उदल वर्मा (भा.व.से.) यांच्या पुढाकाराने व सहकार्याने ग्रामविकास परिसर समितीने समुदाय संघटनांच्या माध्यमातून वने आणि वन्यप्राणी संवर्धनाचा नवा पायंडाच कोरकुंनी पाडला आहे. वनविभागाच्या सहकार्याने येथील कोरकू आदिवासी सद्यस्थितीत येथे येणाऱ्या पर्यटकांची निवास व भोजनाची व्यवस्था तसेच सोव्हीनियार शॉप, पर्यटकांची करमणूूक व जंगल सफारी, ट्रेकिंग अशा विविध सुविधा पुरविण्यात व्यस्त आहेत. सन २०११-१२ मध्ये शहानूर गावाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ३३ हजार ७६९ इतकेच होते. मात्र, या नव्या उपक्रमामुळे गावाने सन २०१४-१५ मध्ये ६ लाख ९१ हजार ५२१ इतक्या उत्पन्नाचा आकडा पार केलाय. ‘इको टुरिझम’ मुळेच हा गाव विकासाच्या प्रवाहात आलय. (प्रतिनिधी)