शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

शेती साहित्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण कुणाचे?

By admin | Updated: July 12, 2014 00:39 IST

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके रास्त भावात उपलब्ध व्हावी, तसेच यामध्ये गैरव्यवहार होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

सुनील देशपांडे अचलपूरशेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके रास्त भावात उपलब्ध व्हावी, तसेच यामध्ये गैरव्यवहार होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. साहित्याची तपासणी करून शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर शासनाने भरारी पथके निर्माण केलेली असली तरी ती कुचकामी ठरत असून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात गारपीट व अतिवृष्टी झाली. नुकसानीने शेतकरी खचला आहे. तरीही तो खरीप पेरणीकरिता सज्ज झाला आहे. बी-बियाणे बहुतांश शेतकऱ्यांनी मिळेल त्या मार्गाने प्राप्त केले. यात शेतकऱ्यांची बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके घेताना फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे भरारी पथकांची नेमणूक करण्यात येते, मात्र ही पथके खरोखरच तपासणी करून संबंधितांवर कारवाई करतात का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हास्तरीय पथकामध्ये जिल्हास्तरीय अधिकारी व तालुक्याच्या पथकात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो. ही पथके बियाणे आणि खतांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतात, असे सांगितले जाते. परंतु भरारी पथक हे अचानक कृषी दुकानांना भेटी देतात तो केवळ देखावा असतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.भरारी पथक भेट देणार किंवा धाड टाकणार याची माहिती अगोदरच काही बड्या कृषी संचालकांना मिळालेली असते, असे शेतकरी वर्गाचे म्हणणे असून हे भरारी पथके काय कामाची? या पथकातील अधिकारी फक्त खिसे गरम करण्यासाठी आहेत काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.भरारी पथकाच्या दौऱ्याबाबत गुप्तता व गोपनीयता पाळून प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यास बरेच काही सत्य बाहेर येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा जिल्हयावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीत शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात बनावट बियाण्यांच्या आक्रमणामुळे तर शेतकऱ्यांना अधिकच त्रासाचा सामना करावा लागणार आहे. ही स्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यात भरारी पथकांची केलेली नेमणूकही निरूपयोगी सिध्द होत असल्याचे दिसते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी आहे.