शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेती साहित्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण कुणाचे?

By admin | Updated: July 12, 2014 00:39 IST

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके रास्त भावात उपलब्ध व्हावी, तसेच यामध्ये गैरव्यवहार होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

सुनील देशपांडे अचलपूरशेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके रास्त भावात उपलब्ध व्हावी, तसेच यामध्ये गैरव्यवहार होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. साहित्याची तपासणी करून शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर शासनाने भरारी पथके निर्माण केलेली असली तरी ती कुचकामी ठरत असून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात गारपीट व अतिवृष्टी झाली. नुकसानीने शेतकरी खचला आहे. तरीही तो खरीप पेरणीकरिता सज्ज झाला आहे. बी-बियाणे बहुतांश शेतकऱ्यांनी मिळेल त्या मार्गाने प्राप्त केले. यात शेतकऱ्यांची बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके घेताना फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे भरारी पथकांची नेमणूक करण्यात येते, मात्र ही पथके खरोखरच तपासणी करून संबंधितांवर कारवाई करतात का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हास्तरीय पथकामध्ये जिल्हास्तरीय अधिकारी व तालुक्याच्या पथकात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो. ही पथके बियाणे आणि खतांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतात, असे सांगितले जाते. परंतु भरारी पथक हे अचानक कृषी दुकानांना भेटी देतात तो केवळ देखावा असतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.भरारी पथक भेट देणार किंवा धाड टाकणार याची माहिती अगोदरच काही बड्या कृषी संचालकांना मिळालेली असते, असे शेतकरी वर्गाचे म्हणणे असून हे भरारी पथके काय कामाची? या पथकातील अधिकारी फक्त खिसे गरम करण्यासाठी आहेत काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.भरारी पथकाच्या दौऱ्याबाबत गुप्तता व गोपनीयता पाळून प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यास बरेच काही सत्य बाहेर येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा जिल्हयावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीत शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात बनावट बियाण्यांच्या आक्रमणामुळे तर शेतकऱ्यांना अधिकच त्रासाचा सामना करावा लागणार आहे. ही स्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यात भरारी पथकांची केलेली नेमणूकही निरूपयोगी सिध्द होत असल्याचे दिसते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी आहे.