शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अभ्यासात सातत्य ठेवा, यश निश्चित मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोनाकाळात परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. त्यामुळेच सहा सुवर्णपदके, ...

अमरावती : कोरोनाकाळात परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. त्यामुळेच सहा सुवर्णपदके, एक रौप्य, रोख पारितोषिक मिळविता आल्याचे अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाची विद्यार्थिनी सारिका वनवे यांनी सांगितले.

अमरावती विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षांत समारंभात मुलींमधून सर्वाधिक पदके पटकाविण्याचा बहुमान मिळाल्यावर सारिका वनवे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसाेपंत तालुक्यातील आसोला या गावाच्या त्या रहिवासी आहेत. त्यांनी एम.एड्. केले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतानाच नेट-सेट करता आले. आता पीएच.डी.ला प्रवेश आहे. उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी काही तरी करण्याच्या इच्छेतून ‘पश्चिम विदर्भातील पारधी समाजाची संस्कृती व त्याचा लोकवाङ्याचा अभ्यास’ या विषयावर संशोधन त्या करणार आहेत.

सुवर्णझळाळीमध्ये गुरुजनांचे मोठे पाठबळ मिळाले. अभ्यास किती तास केला, त्यापेक्षा तो आत्मसात किती झाला, हे महत्वाचे आहे. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन केल्यास यश मिळते, असे सारिका म्हणाल्या. विद्यापीठात शिक्षणाची कोरोनाकाळात भयानक दशा झाल्याचे दिसून आले. या काळातही निरंतर अभ्यास, वाचन सुरूच होते. त्यामुळे परीक्षेत कुठलीही अडचण गेली नाही, असे सारिका वनवे म्हणाल्या. प्राध्यापकी पेशातून उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.