शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा तलाठ्याकडून अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST

नीलेश भोकरे/करजगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन दिवस कर्तव्यावर रुजू झालेले मौजा गोविंदपूर सांझाचे तलाठी सातत्याने गैरहजर राहत असल्याचे पुढे ...

नीलेश भोकरे/करजगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन दिवस कर्तव्यावर रुजू झालेले मौजा गोविंदपूर सांझाचे तलाठी सातत्याने गैरहजर राहत असल्याचे पुढे आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा तलाठ्यांकडून अवमान होत असल्याच्या प्रतिक्रिया यामुळे व्यक्त होत आहेत.

चांदूर बाजार तालुक्यातील मौजा गोविंदपूर साझाकरिता तलाठी म्हणून घुलक्षे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, ते आपल्या सांझाला सतत गैरहजर राहिल्याने गोविंदपूर येथील शेतकरी अरविंद धामडे यांनी मंडळ अधिकाऱ्याकडे २०१८ मध्ये तक्रार केली. प्रकरण निकाली न निघाल्याने तहसीलदारांकडे नेण्यात आले. त्यांच्या आदेशाला तलाठ्यांनी केराची टोपली दाखविली. यामुळे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली गेली. जिल्हाधिकाऱ्यांच्या २९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या पत्रावरून चांदूर बाजारच्या तहसीलदारांनी आदेश दिल्याने दोन दिवस तलाठी घुलक्षे हे मौजा गोविंदपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहिले. यानंतर कूलर वा पंखा नसल्याचे कारण देत सांझावरून सतत गैरहजर राहिले. ते अद्यापपर्यंत गावाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी यांना शालेय कामाकरिता तसेच वृद्धांना, विधवा, निराधारांना तहसीलकरिता लागणारे दाखले मिळविण्याकरिता तलाठ्याला गाठण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर चकरा माराव्या लागतात. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ही फरफट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

----------

मी शेतकरी आहे. २०१८ ला लेखी तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे दोन दिवस तलाठी आले. यानंतर कूलर, पंखा नसल्याचा बहाणा करीत सातत्याने गैरहजर आहेत. यामुळे विद्यार्थी, शेतकरी यांना दाखले मिळविण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा.

- अरविंद धामडे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद पूर