शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा तलाठ्याकडून अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST

नीलेश भोकरे/करजगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन दिवस कर्तव्यावर रुजू झालेले मौजा गोविंदपूर सांझाचे तलाठी सातत्याने गैरहजर राहत असल्याचे पुढे ...

नीलेश भोकरे/करजगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन दिवस कर्तव्यावर रुजू झालेले मौजा गोविंदपूर सांझाचे तलाठी सातत्याने गैरहजर राहत असल्याचे पुढे आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा तलाठ्यांकडून अवमान होत असल्याच्या प्रतिक्रिया यामुळे व्यक्त होत आहेत.

चांदूर बाजार तालुक्यातील मौजा गोविंदपूर साझाकरिता तलाठी म्हणून घुलक्षे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, ते आपल्या सांझाला सतत गैरहजर राहिल्याने गोविंदपूर येथील शेतकरी अरविंद धामडे यांनी मंडळ अधिकाऱ्याकडे २०१८ मध्ये तक्रार केली. प्रकरण निकाली न निघाल्याने तहसीलदारांकडे नेण्यात आले. त्यांच्या आदेशाला तलाठ्यांनी केराची टोपली दाखविली. यामुळे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली गेली. जिल्हाधिकाऱ्यांच्या २९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या पत्रावरून चांदूर बाजारच्या तहसीलदारांनी आदेश दिल्याने दोन दिवस तलाठी घुलक्षे हे मौजा गोविंदपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहिले. यानंतर कूलर वा पंखा नसल्याचे कारण देत सांझावरून सतत गैरहजर राहिले. ते अद्यापपर्यंत गावाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी यांना शालेय कामाकरिता तसेच वृद्धांना, विधवा, निराधारांना तहसीलकरिता लागणारे दाखले मिळविण्याकरिता तलाठ्याला गाठण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर चकरा माराव्या लागतात. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ही फरफट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

----------

मी शेतकरी आहे. २०१८ ला लेखी तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे दोन दिवस तलाठी आले. यानंतर कूलर, पंखा नसल्याचा बहाणा करीत सातत्याने गैरहजर आहेत. यामुळे विद्यार्थी, शेतकरी यांना दाखले मिळविण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा.

- अरविंद धामडे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद पूर