शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

येवद्यात मजीप्राचा दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:12 IST

जलजन्य आजार बळावण्याची शक्यता, प्राधिकरणाचा नागरिकांच्या जिवाशी खेळ येवदा : गत पाच ते सहा दिवसांपासून दूषित व गढूळ पाण्याचा ...

जलजन्य आजार बळावण्याची शक्यता, प्राधिकरणाचा नागरिकांच्या जिवाशी खेळ

येवदा : गत पाच ते सहा दिवसांपासून दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अतिसार, टायफाॅईड, काविळ, डायरिया यांसारख्या जलजन्य आजाराचा धोका येथील नागरिकांना संभवत आहे.

जवळपास २० हजार लोकसंख्या असलेल्या येवदा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जलजन्य आजारांमध्ये वाढ होण्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण असतानाच दूषित पाण्यामुळे वाढणारे रुग्ण हे आरोग्य विभागाची चिंता वाढवित आहेत.

धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्याचे क्लोरीनेशन होणे गरजेचे आहे. येवदा येथे क्लोरिनेशन प्लांट असतानासुद्धा येथील पाणी आरोग्य विभागाने तपासले तेव्हा पाण्यात क्लोरिनचे प्रमाण आढळलेच नाही. तसा अहवाल आरोग्य विभागाने प्राधिकरणाकडे पाठविला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळॆ हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात नकुल सोनटक्के यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध नागरिकांच्या जिवाशी खेळ करणे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जीवन प्राधिकरणाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे नकुल सोनटक्के यांनी सांगितले.

--------------------

येवदा येथील पाण्याची तपासणी केली असता, ते गढूळ होते. त्यात क्लोरीन आढळले नाही. तसा निगेटिव्ह रिपोर्ट ग्रामपंचायत व प्राधिकरणाला पाठविला आहे. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका संभवतो. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे.

- विनोद दरोकार, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, येवदा

------------------

धरण क्षेत्रात खूप पाऊस झाल्याने संपूर्ण दर्यापूर व अंजगाव तालुक्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी शुद्धीकरण करणे सुरू आहे. काही दिवसांमध्ये परिस्थिती सुधारेल.

- अभय देशमुख, सहायक अभियंता, मजीप्रा, दर्यापूर

--------------