शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

वन्यजीव अधिवास योजनेत माळढोकांचे संवर्धन

By admin | Updated: September 11, 2016 00:10 IST

वन्यजीव आधिवासाचा एकात्मिक विकास या योजनेतून माळढोक तणमोरचे संवर्धन केले जाणार आहे.

नव्याने समावेश : अधिवास क्षेत्रात वन्यजीवांचे व्यवस्थापन अमरावती : वन्यजीव आधिवासाचा एकात्मिक विकास या योजनेतून माळढोक तणमोरचे संवर्धन केले जाणार आहे. केंद्र पुरस्कृत या योजनेच्या कालानुरुप कार्यबाबींमध्ये महसूल व वनविभागाने काही बदल करून नवी कार्यपद्धती अंगीकारण्याचे निर्देश अधिनस्थ यंत्रणेला दिले आहे. सर्व संक्षित क्षेत्रातील वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन आणि संरक्षित क्षेत्रालगतच्या क्षेत्रात मानव- वन्यजीव संघर्ष होवू नये यासाठी ‘वन्यजीव अधिवासाचा एकात्मिक विकास’ या योजने अंतर्गत उपाययोजना राबविण्यात येतात. राष्ट्रीय उद्यान- अभयारण्य क्षेत्रातील वन्यजीव व अधिवासाचा एकात्मिक विकास योजनेअंतर्गत माळढोक- तणमोर संवर्धनसाठी गवताळ क्षेत्राची पुनर्स्थापना, पाणथळ निर्मिती, पीडीए, जीपीएल तथा दुर्बिणची खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय माळढोक- तणमोर स्रेही कृषी पिकांना प्रोत्साहन देण्यात येईल. संवर्धनासाठी नियुक्त केलेल्या माळढोक मित्रांना मानधन देण्याचे प्रयोजनही या योजनेत आहे. वन्यजीव संरक्षणासाठी निरीक्षण मनोरे बांधण्यासह तपासणी नाके आणि बिनतारी संदेश यंत्रणा राबविली जाईल. वन्यजीव संरक्षणार्थ निरीक्षण मनोरे बांधण्यासह तपासणी नाके आणि बिनतारी संदेश यंत्रणा राबविली जाईल. वन्यजीव संरक्षणार्थ वारपल्या जाणाऱ्या रस्त्यांवर रपटे, सिमेंट बंधारे, गॅबियन, भूमिगत बंधारे या कामांचाही समावेश करण्यात आला आहे. या शिवाय या योजनेतून मचाण, संरक्षण कुटी, निरीक्षण मनोरे, निसर्ग पायवाट, दुरुस्ती अभिप्रेत आहे. संशयित क्षेत्रातील वन्यप्राणी संरक्षित क्षेत्राबाहेर जाणार नाही, याकरिता ही या योजनेअंतर्गत न्याय योजना केल्या जातील. (प्रतिनिधीराज्यात ५९ संरक्षित क्षेत्र महाराष्ट्रात सर्वप्रथम १९५५ साली ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे पहिले संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यानंतरच्या काळात नवनवीन संरक्षित क्षेत्राची भर पडत गेली व आजमितीस राज्यात सहा राष्ट्रीय उद्याने, ४८ अभयारण्य व ५ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५९ संरक्षित क्षेत्र अधिसूचित करण्यात आली आहेत. राज्यातील १९ संरक्षित क्षेत्राचा (५ रोट्रीय उद्याने व १४ अभयारण्ये) समावेश करुन मेळघाट, पेंच, ताडोबा- अंधारी, सहायद्री, नवेगाव- नागझिरा आणि बोर असे एकूण ६ व्याघ्र प्रकल्प आहेत. ह्या सर्व संरक्षित क्षेत्रातील वन्यजीवांचे संरक्षण , संवर्धन करणे, संरक्षित क्षेत्रालगतच्या क्षेत्रात कमीतकमी मानव वन्यजीव संघर्ष व्हावा या दृष्टीने बऱ्याच उपाययोजना केल्या जात आहे. संरक्षित क्षेत्रातील ह्या उपाययोजनांसाठी ‘वन्यजीव अधिवासाचा एकात्मिक विकास’ ह्या योजनांतर्गत केंद्र शासनाकडून अनुदान उपलबब्ध होत असते. योजनेची मुख्य उद्दिष्टे वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करणे वन्यप्राण्यांच्या शिकारीवर आळा घालणेसंरक्षित क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती करणे. वन्यजीव अधिवासाचा विकास मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणे. राष्ट्रीय उद्यान/ अभयारण्य क्षेत्रातीलगावाचे पुनर्वसन करुन एकसंघ व मानवी हस्तक्षेप मुक्त वन्यजीव अधिवास क्षेत्राची निर्मिती करणे. राष्ट्रीय उद्यान/ अभयारण्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविणे.