शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव अधिवास योजनेत माळढोकांचे संवर्धन

By admin | Updated: September 11, 2016 00:10 IST

वन्यजीव आधिवासाचा एकात्मिक विकास या योजनेतून माळढोक तणमोरचे संवर्धन केले जाणार आहे.

नव्याने समावेश : अधिवास क्षेत्रात वन्यजीवांचे व्यवस्थापन अमरावती : वन्यजीव आधिवासाचा एकात्मिक विकास या योजनेतून माळढोक तणमोरचे संवर्धन केले जाणार आहे. केंद्र पुरस्कृत या योजनेच्या कालानुरुप कार्यबाबींमध्ये महसूल व वनविभागाने काही बदल करून नवी कार्यपद्धती अंगीकारण्याचे निर्देश अधिनस्थ यंत्रणेला दिले आहे. सर्व संक्षित क्षेत्रातील वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन आणि संरक्षित क्षेत्रालगतच्या क्षेत्रात मानव- वन्यजीव संघर्ष होवू नये यासाठी ‘वन्यजीव अधिवासाचा एकात्मिक विकास’ या योजने अंतर्गत उपाययोजना राबविण्यात येतात. राष्ट्रीय उद्यान- अभयारण्य क्षेत्रातील वन्यजीव व अधिवासाचा एकात्मिक विकास योजनेअंतर्गत माळढोक- तणमोर संवर्धनसाठी गवताळ क्षेत्राची पुनर्स्थापना, पाणथळ निर्मिती, पीडीए, जीपीएल तथा दुर्बिणची खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय माळढोक- तणमोर स्रेही कृषी पिकांना प्रोत्साहन देण्यात येईल. संवर्धनासाठी नियुक्त केलेल्या माळढोक मित्रांना मानधन देण्याचे प्रयोजनही या योजनेत आहे. वन्यजीव संरक्षणासाठी निरीक्षण मनोरे बांधण्यासह तपासणी नाके आणि बिनतारी संदेश यंत्रणा राबविली जाईल. वन्यजीव संरक्षणार्थ निरीक्षण मनोरे बांधण्यासह तपासणी नाके आणि बिनतारी संदेश यंत्रणा राबविली जाईल. वन्यजीव संरक्षणार्थ वारपल्या जाणाऱ्या रस्त्यांवर रपटे, सिमेंट बंधारे, गॅबियन, भूमिगत बंधारे या कामांचाही समावेश करण्यात आला आहे. या शिवाय या योजनेतून मचाण, संरक्षण कुटी, निरीक्षण मनोरे, निसर्ग पायवाट, दुरुस्ती अभिप्रेत आहे. संशयित क्षेत्रातील वन्यप्राणी संरक्षित क्षेत्राबाहेर जाणार नाही, याकरिता ही या योजनेअंतर्गत न्याय योजना केल्या जातील. (प्रतिनिधीराज्यात ५९ संरक्षित क्षेत्र महाराष्ट्रात सर्वप्रथम १९५५ साली ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे पहिले संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यानंतरच्या काळात नवनवीन संरक्षित क्षेत्राची भर पडत गेली व आजमितीस राज्यात सहा राष्ट्रीय उद्याने, ४८ अभयारण्य व ५ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५९ संरक्षित क्षेत्र अधिसूचित करण्यात आली आहेत. राज्यातील १९ संरक्षित क्षेत्राचा (५ रोट्रीय उद्याने व १४ अभयारण्ये) समावेश करुन मेळघाट, पेंच, ताडोबा- अंधारी, सहायद्री, नवेगाव- नागझिरा आणि बोर असे एकूण ६ व्याघ्र प्रकल्प आहेत. ह्या सर्व संरक्षित क्षेत्रातील वन्यजीवांचे संरक्षण , संवर्धन करणे, संरक्षित क्षेत्रालगतच्या क्षेत्रात कमीतकमी मानव वन्यजीव संघर्ष व्हावा या दृष्टीने बऱ्याच उपाययोजना केल्या जात आहे. संरक्षित क्षेत्रातील ह्या उपाययोजनांसाठी ‘वन्यजीव अधिवासाचा एकात्मिक विकास’ ह्या योजनांतर्गत केंद्र शासनाकडून अनुदान उपलबब्ध होत असते. योजनेची मुख्य उद्दिष्टे वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करणे वन्यप्राण्यांच्या शिकारीवर आळा घालणेसंरक्षित क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती करणे. वन्यजीव अधिवासाचा विकास मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणे. राष्ट्रीय उद्यान/ अभयारण्य क्षेत्रातीलगावाचे पुनर्वसन करुन एकसंघ व मानवी हस्तक्षेप मुक्त वन्यजीव अधिवास क्षेत्राची निर्मिती करणे. राष्ट्रीय उद्यान/ अभयारण्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविणे.