शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारविरोधात कॉग्रेस धडकणार विधानभवनावर

By admin | Updated: December 2, 2015 00:24 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा शिवसेना सरकारच्या जनहितविरोधी कारभाराविरोधात ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील...

पत्रपरिषद : बबलू देशमुख यांची माहितीअमरावती : केंद्र आणि राज्यातील भाजपा शिवसेना सरकारच्या जनहितविरोधी कारभाराविरोधात ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जवळपास १५ हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. तपूर्वी जिल्हा काँगे्रस पक्षाचे पदाधिकाऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात त्यांनी बैठक घेऊन मोर्चासंदर्भात विस्तृत चर्चा केली. पुढे बोलताना देशमुख म्हणालेत केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन दीड वर्ष झाले. राज्यातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असताना भाजपा सरकारने एकही निर्णय जनहिताचा घेतला नाही.भाजपा सरकारने सर्वत्र नापिकी आणि दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या हातचे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे सोयाबिनला हमी भाव तर दिलाच नाही. आतातर सोयाबीनच राहिले नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाहेक्टरी २५ हजार रूपये आर्थीक मदत द्यावी, कापसाला केवळ ४ हजार रूपये हमी भाव दिला आहे. कापसाला किमान सहा हजार रूपये भाव द्यावा, याशिवाय नापिकी व दुष्काळा मुळे शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्यात यावी, संत्रा उत्पादकांचेही नुकसान झाले आहे. त्यामळे या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रूपये अनुदान द्यावे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकरी आत्महत्या वाढल्याने शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ठोस उपायोजना कराव्यात, यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी पुष्पाताई बोंडे, सतीश उईके, गिरीश कराळे, केवलराम काळे, उडा उताणे, श्रीराम नेहर, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर महेंद्रसिंग गैलवार, विद्या देडू, बंडू देशमुल विलास पवार, प्रमोद दाळू, भानुदास चोपडे, बिटू मंग़रोळे, बच्चु बोबडे गणेश आरेकर उपस्थित होते.