शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकांच्या पदोन्नतीनंतर पदस्थापनेत घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

अनिल कडू परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेत घोळ घालण्यात आल्याची ओरड आहे. यात ...

अनिल कडू

परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेत घोळ घालण्यात आल्याची ओरड आहे. यात शिफारशींसह बदलीस पात्र वनपालांवर अन्याय झाला आहे. समुपदेशनासह नियमांना तिलांजली देण्यात आली आहे. उपवनसंरक्षकांसह लोकप्रतिनिधींच्या शिफारशींना दुर्लक्षित केल्या गेले. नागरी सेवा मंडळ व त्यातील सदस्यांची कार्यप्रणाली यात चर्चेत आली आहे.

मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) अमरावती यांचे २९ एप्रिलचे कार्यालयीन आदेशान्वये २२ वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार त्यांना पदोन्नतीनंतर वन्यजीव विभागासह मेळघाटात पदस्थापना द्यायला हवी होती. पण तसे न करता प्रादेशिकमधली मंडळी पदोन्नतीनंतरही प्रादेशिकमध्येच ठेवल्या गेली. काहींना तर बुलडाण्याचे बुलडाण्यात आणि अमरावतीचे अमरावतीत पदस्थापना दिल्या गेली. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिदुर्गम भागात अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या वनपालांना डावलण्यात आले आहे. त्यांचा विनंती अर्ज आणि या अर्जावर उपवनसंरक्षकांकडून आलेल्या शिफारशीही विचारात घेतल्या गेल्या नाहीत. समुपदेशनाची प्रक्रिया राबविली गेली नाही. प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पदोन्नतीसह दिल्या गेलेल्या पदस्थापनेस स्थगिती द्यावी. बदली समितीतील, नागरी सेवा मंडळातील सदस्यांची चौकशी करावी, काहींचे कॉल रेकॉर्ड तपासावेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटातील वनकर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

अनेक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

वनविभागाच्या राज्यातील विविध विभागांत वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने नियमानुसार राबविली गेली. यात अनेकांना पदोन्नती मिळाली असून वनपालांच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादीत त्यांनी आपला क्रमांक निश्चित केला. पण, अमरावती विभागातील वनरक्षक यात पिछाडीवर आहेत. १७ वर्षांपासून अमरावती विभागात कार्यरत वनरक्षकांना, वनपालपदी पदोन्नती देण्यात आलेली नाही. यासाठी ते प्रतीक्षेत आहेत. नियमानुसार पात्र वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती मिळावी याकरिता त्यांनी संबंधित वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे निवेदनेही दिली आहेत. पण या पदोन्नतीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. यात सर्वसाधारण वनरक्षकांमध्ये रोष बघायला मिळत आहे. पदोन्नतीस पात्र असतानाही अमरावती विभागातील वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती न मिळाल्यामुळे राज्यस्तरीय सेवाज्येष्ठता यादीत त्यांना आपले स्थान व आपला क्रमांक निश्चित करता आलेला नाही.

कोट

संबंधित वनाधिकाऱ्यांचा