शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

वनरक्षकांच्या पदोन्नतीनंतर पदस्थापनेत घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

अनिल कडू परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेत घोळ घालण्यात आल्याची ओरड आहे. यात ...

अनिल कडू

परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेत घोळ घालण्यात आल्याची ओरड आहे. यात शिफारशींसह बदलीस पात्र वनपालांवर अन्याय झाला आहे. समुपदेशनासह नियमांना तिलांजली देण्यात आली आहे. उपवनसंरक्षकांसह लोकप्रतिनिधींच्या शिफारशींना दुर्लक्षित केल्या गेले. नागरी सेवा मंडळ व त्यातील सदस्यांची कार्यप्रणाली यात चर्चेत आली आहे.

मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) अमरावती यांचे २९ एप्रिलचे कार्यालयीन आदेशान्वये २२ वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार त्यांना पदोन्नतीनंतर वन्यजीव विभागासह मेळघाटात पदस्थापना द्यायला हवी होती. पण तसे न करता प्रादेशिकमधली मंडळी पदोन्नतीनंतरही प्रादेशिकमध्येच ठेवल्या गेली. काहींना तर बुलडाण्याचे बुलडाण्यात आणि अमरावतीचे अमरावतीत पदस्थापना दिल्या गेली. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिदुर्गम भागात अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या वनपालांना डावलण्यात आले आहे. त्यांचा विनंती अर्ज आणि या अर्जावर उपवनसंरक्षकांकडून आलेल्या शिफारशीही विचारात घेतल्या गेल्या नाहीत. समुपदेशनाची प्रक्रिया राबविली गेली नाही. प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पदोन्नतीसह दिल्या गेलेल्या पदस्थापनेस स्थगिती द्यावी. बदली समितीतील, नागरी सेवा मंडळातील सदस्यांची चौकशी करावी, काहींचे कॉल रेकॉर्ड तपासावेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटातील वनकर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

अनेक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

वनविभागाच्या राज्यातील विविध विभागांत वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने नियमानुसार राबविली गेली. यात अनेकांना पदोन्नती मिळाली असून वनपालांच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादीत त्यांनी आपला क्रमांक निश्चित केला. पण, अमरावती विभागातील वनरक्षक यात पिछाडीवर आहेत. १७ वर्षांपासून अमरावती विभागात कार्यरत वनरक्षकांना, वनपालपदी पदोन्नती देण्यात आलेली नाही. यासाठी ते प्रतीक्षेत आहेत. नियमानुसार पात्र वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती मिळावी याकरिता त्यांनी संबंधित वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे निवेदनेही दिली आहेत. पण या पदोन्नतीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. यात सर्वसाधारण वनरक्षकांमध्ये रोष बघायला मिळत आहे. पदोन्नतीस पात्र असतानाही अमरावती विभागातील वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती न मिळाल्यामुळे राज्यस्तरीय सेवाज्येष्ठता यादीत त्यांना आपले स्थान व आपला क्रमांक निश्चित करता आलेला नाही.

कोट

संबंधित वनाधिकाऱ्यांचा