शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

वनरक्षकांच्या पदोन्नतीनंतर पदस्थापनेत घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

अनिल कडू परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेत घोळ घालण्यात आल्याची ओरड आहे. यात ...

अनिल कडू

परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेत घोळ घालण्यात आल्याची ओरड आहे. यात शिफारशींसह बदलीस पात्र वनपालांवर अन्याय झाला आहे. समुपदेशनासह नियमांना तिलांजली देण्यात आली आहे. उपवनसंरक्षकांसह लोकप्रतिनिधींच्या शिफारशींना दुर्लक्षित केल्या गेले. नागरी सेवा मंडळ व त्यातील सदस्यांची कार्यप्रणाली यात चर्चेत आली आहे.

मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) अमरावती यांचे २९ एप्रिलचे कार्यालयीन आदेशान्वये २२ वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार त्यांना पदोन्नतीनंतर वन्यजीव विभागासह मेळघाटात पदस्थापना द्यायला हवी होती. पण तसे न करता प्रादेशिकमधली मंडळी पदोन्नतीनंतरही प्रादेशिकमध्येच ठेवल्या गेली. काहींना तर बुलडाण्याचे बुलडाण्यात आणि अमरावतीचे अमरावतीत पदस्थापना दिल्या गेली. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिदुर्गम भागात अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या वनपालांना डावलण्यात आले आहे. त्यांचा विनंती अर्ज आणि या अर्जावर उपवनसंरक्षकांकडून आलेल्या शिफारशीही विचारात घेतल्या गेल्या नाहीत. समुपदेशनाची प्रक्रिया राबविली गेली नाही. प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पदोन्नतीसह दिल्या गेलेल्या पदस्थापनेस स्थगिती द्यावी. बदली समितीतील, नागरी सेवा मंडळातील सदस्यांची चौकशी करावी, काहींचे कॉल रेकॉर्ड तपासावेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मेळघाटातील वनकर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

अनेक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

वनविभागाच्या राज्यातील विविध विभागांत वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने नियमानुसार राबविली गेली. यात अनेकांना पदोन्नती मिळाली असून वनपालांच्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादीत त्यांनी आपला क्रमांक निश्चित केला. पण, अमरावती विभागातील वनरक्षक यात पिछाडीवर आहेत. १७ वर्षांपासून अमरावती विभागात कार्यरत वनरक्षकांना, वनपालपदी पदोन्नती देण्यात आलेली नाही. यासाठी ते प्रतीक्षेत आहेत. नियमानुसार पात्र वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती मिळावी याकरिता त्यांनी संबंधित वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे निवेदनेही दिली आहेत. पण या पदोन्नतीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. यात सर्वसाधारण वनरक्षकांमध्ये रोष बघायला मिळत आहे. पदोन्नतीस पात्र असतानाही अमरावती विभागातील वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती न मिळाल्यामुळे राज्यस्तरीय सेवाज्येष्ठता यादीत त्यांना आपले स्थान व आपला क्रमांक निश्चित करता आलेला नाही.

कोट

संबंधित वनाधिकाऱ्यांचा