शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पहिलीसाठी साडेपाच वर्षांची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट सहाऐवजी साडेपाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गात ...

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट सहाऐवजी साडेपाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ३० सप्टेंबरला सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जात होता. यंदापासून त्यात शिथिलता देत ३१ डिसेंबरची अट लादण्यात आली आहे.

राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असताना, पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी साडेपाच वर्षे वयाची अट घातली. यापूर्वी याच विभागाने बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत प्रवेश द्यावा, या स्वतःच्याच पूर्वआदेशाला कोलदांडा दिला आहे. कागदोपत्री 'सहा वर्षे पूर्ण' या शब्दाच्या आडून सातत्याने निकषात बदल केला गेल्याने साडेपाच वयाच्या बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जात आहे. प्राथमिक शाळांनी या निकषाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच सुजाण नागरिकांनी याला विरोध केला आहे. मानसिक आणि बौद्धिक क्षमता विकासाच्या मुद्यावर मुलांच्या भवितव्याशी सरकारी व्यवस्थेने उघडउघड खेळ मांडला असल्याचा आरोपही हे पालक करत आहेत. सध्याच्या निकषानुसार साडेपाच वर्षांच्या मुलांना शाळेत प्रविष्ट करण्यास पालकांचा विरोध होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, पुढील वर्षी संबंधित मुलांना (साडेसहा वर्षे पूर्ण होत असल्याने आणि आरटीई कायद्याच्या अधीन) इयत्ता पहिलीऐवजी सरळ दुसऱ्या वर्गात प्रवेश घ्यावा लागणार आहे. अशावेळी महत्त्वाची बाब म्हणजे, जानेवारी महिन्यात जन्मणारे मूल पहिल्या वर्गात, तर अवघे एक महिना अगोदर म्हणजेच डिसेंबर महिन्यात जन्माला येणारे मूल दुसऱ्या वर्गात जाणार आहे. कारण, विहित दिनांकानुसार शालेय विभागाने आपल्या संकेतस्थळावर वयोगट अपलोड केला आहे. दुसरीकडे निकष प्रमाण मानून (तीन महिने आधीच) मुलांचा शैक्षणिक प्रवेश झाल्याने सध्याच्या पटसंख्येत किमान २० टक्के वृद्धी झाली आहे. अशावेळी गरजेनुसार अपेक्षित शिक्षकसंख्या मात्र वाढणार नाही. याशिवाय पुढील वर्षी पटसंख्या घटण्याबरोबरच शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.