शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

पहिलीसाठी साडेपाच वर्षांची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट सहाऐवजी साडेपाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गात ...

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट सहाऐवजी साडेपाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ३० सप्टेंबरला सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जात होता. यंदापासून त्यात शिथिलता देत ३१ डिसेंबरची अट लादण्यात आली आहे.

राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असताना, पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी साडेपाच वर्षे वयाची अट घातली. यापूर्वी याच विभागाने बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत प्रवेश द्यावा, या स्वतःच्याच पूर्वआदेशाला कोलदांडा दिला आहे. कागदोपत्री 'सहा वर्षे पूर्ण' या शब्दाच्या आडून सातत्याने निकषात बदल केला गेल्याने साडेपाच वयाच्या बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जात आहे. प्राथमिक शाळांनी या निकषाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच सुजाण नागरिकांनी याला विरोध केला आहे. मानसिक आणि बौद्धिक क्षमता विकासाच्या मुद्यावर मुलांच्या भवितव्याशी सरकारी व्यवस्थेने उघडउघड खेळ मांडला असल्याचा आरोपही हे पालक करत आहेत. सध्याच्या निकषानुसार साडेपाच वर्षांच्या मुलांना शाळेत प्रविष्ट करण्यास पालकांचा विरोध होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, पुढील वर्षी संबंधित मुलांना (साडेसहा वर्षे पूर्ण होत असल्याने आणि आरटीई कायद्याच्या अधीन) इयत्ता पहिलीऐवजी सरळ दुसऱ्या वर्गात प्रवेश घ्यावा लागणार आहे. अशावेळी महत्त्वाची बाब म्हणजे, जानेवारी महिन्यात जन्मणारे मूल पहिल्या वर्गात, तर अवघे एक महिना अगोदर म्हणजेच डिसेंबर महिन्यात जन्माला येणारे मूल दुसऱ्या वर्गात जाणार आहे. कारण, विहित दिनांकानुसार शालेय विभागाने आपल्या संकेतस्थळावर वयोगट अपलोड केला आहे. दुसरीकडे निकष प्रमाण मानून (तीन महिने आधीच) मुलांचा शैक्षणिक प्रवेश झाल्याने सध्याच्या पटसंख्येत किमान २० टक्के वृद्धी झाली आहे. अशावेळी गरजेनुसार अपेक्षित शिक्षकसंख्या मात्र वाढणार नाही. याशिवाय पुढील वर्षी पटसंख्या घटण्याबरोबरच शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.