शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पहिलीसाठी साडेपाच वर्षांची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट सहाऐवजी साडेपाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गात ...

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट सहाऐवजी साडेपाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ३० सप्टेंबरला सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जात होता. यंदापासून त्यात शिथिलता देत ३१ डिसेंबरची अट लादण्यात आली आहे.

राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असताना, पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी साडेपाच वर्षे वयाची अट घातली. यापूर्वी याच विभागाने बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत प्रवेश द्यावा, या स्वतःच्याच पूर्वआदेशाला कोलदांडा दिला आहे. कागदोपत्री 'सहा वर्षे पूर्ण' या शब्दाच्या आडून सातत्याने निकषात बदल केला गेल्याने साडेपाच वयाच्या बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जात आहे. प्राथमिक शाळांनी या निकषाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच सुजाण नागरिकांनी याला विरोध केला आहे. मानसिक आणि बौद्धिक क्षमता विकासाच्या मुद्यावर मुलांच्या भवितव्याशी सरकारी व्यवस्थेने उघडउघड खेळ मांडला असल्याचा आरोपही हे पालक करत आहेत. सध्याच्या निकषानुसार साडेपाच वर्षांच्या मुलांना शाळेत प्रविष्ट करण्यास पालकांचा विरोध होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, पुढील वर्षी संबंधित मुलांना (साडेसहा वर्षे पूर्ण होत असल्याने आणि आरटीई कायद्याच्या अधीन) इयत्ता पहिलीऐवजी सरळ दुसऱ्या वर्गात प्रवेश घ्यावा लागणार आहे. अशावेळी महत्त्वाची बाब म्हणजे, जानेवारी महिन्यात जन्मणारे मूल पहिल्या वर्गात, तर अवघे एक महिना अगोदर म्हणजेच डिसेंबर महिन्यात जन्माला येणारे मूल दुसऱ्या वर्गात जाणार आहे. कारण, विहित दिनांकानुसार शालेय विभागाने आपल्या संकेतस्थळावर वयोगट अपलोड केला आहे. दुसरीकडे निकष प्रमाण मानून (तीन महिने आधीच) मुलांचा शैक्षणिक प्रवेश झाल्याने सध्याच्या पटसंख्येत किमान २० टक्के वृद्धी झाली आहे. अशावेळी गरजेनुसार अपेक्षित शिक्षकसंख्या मात्र वाढणार नाही. याशिवाय पुढील वर्षी पटसंख्या घटण्याबरोबरच शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.