शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

स्थिती दुष्काळजन्य

By admin | Updated: September 19, 2015 00:02 IST

जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली.

नजरअंदाज पैसेवारी ५९ पैसे : ६७ पैशांच्या आत पैसेवारीचे सुधारित निकषलोकमत विशेषगजानन मोहोडअमरावतीजिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली. सर्व तालुक्यांची सुधारीत पैसेवारी ही ५९ पैसे आहे. तथापी शासनाने १६ सप्टेंबरला उशीरा घेतलेल्या निर्णयानुसार पैसेवारीचे यापूर्वीचे निकष बदललेले सुधारित पद्धतीनुसार ६७ पैशापेक्षा कमी व ६७ पैश्यापेक्षा जास्त असे दुष्काळजन्य स्थितीचे निकष ठरले आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६७ पैशांच्या आत असल्याने सोयी-सवलती मिळणार आहेत. अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागाची नजरअंदाज पैसेवारी ही दरवर्षी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येत असते. परंतु यंदा या तीनही विभागांसह राज्यात असणारी दुष्काळसदृश जाहीर करण्याच्या अनुषंगाने चालू हंगामात ३० सप्टेंबर ऐवजी १५ सप्टेंबर तारीख समजून तीनही विभागाची नजरअंदाज पैसेवारी तत्काळ जाहीर करावी, असे महसूल विभागाचे उपसचिव मंदार पोहोरे यांनी १५ सप्टेंबरला विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते. या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी १६ सप्टेंबरला शासनाने पैसेवारी काढण्याची सुधारित पद्धत जाहीर केली. या आदेशान्वये मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशाच्या कमी व जास्त असे पैसेवारी आलेली गावे घोषित करावी, असे आदेश शासनाने दिलेत. सर्व विभागाची पैसेवारी एकाच वेळीराज्यातील कोकण, पुणे व नाशीक विभागाची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला जाहीर करण्यात येते व औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाची ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येत असते. किंबहुना राज्यातील दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करण्याच्या अनुषंगाने शासनाने सर्व विभागांची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला एकाच वेळी जाहीर करण्याच्या अनुषंगाने १५ सप्टेंबरला हा निर्णय घेतला. पैसेवारीच्या ५० पैशाचे निकष बदललेशासनाने ४ मार्च १९८९ चे ठरावानुसार लगतच्या मागील १० वर्षांच्या कालावधीत ३ उत्तम उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण समजून ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांना सोयीसवलती देण्यात येतात. मात्र शासनाने १६ सप्टेंबर रोजी पैसेवारीचे प्रचलित निकष बदलविले, या नव्या निकषानुसार मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशांपेक्षा कमी व ६७ पैश्यापेक्षा जास्त असे पैसेवारीचे निकष ठरविण्यात आलेले आहेत. केंद्राला करणार मदतीची मागणीजून महिन्यात पेरणीपासून पावसाची दडी व त्यानंतर पुन्हा पावसाची प्रदीर्घ दडी यामुळे राज्यात एकाही जिल्ह्याने पावसाची अपेक्षित सरासरी पार केलेली नाही. राज्यात दुष्काळसदृष्य स्थिती आहे व ही दुष्काळ स्थिती जाहीर करून केंद्र शासनाकडून मदतीची ज्ञापन पाठविण्यात येणार आहे.