शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

स्थिती दुष्काळजन्य

By admin | Updated: September 19, 2015 00:02 IST

जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली.

नजरअंदाज पैसेवारी ५९ पैसे : ६७ पैशांच्या आत पैसेवारीचे सुधारित निकषलोकमत विशेषगजानन मोहोडअमरावतीजिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली. सर्व तालुक्यांची सुधारीत पैसेवारी ही ५९ पैसे आहे. तथापी शासनाने १६ सप्टेंबरला उशीरा घेतलेल्या निर्णयानुसार पैसेवारीचे यापूर्वीचे निकष बदललेले सुधारित पद्धतीनुसार ६७ पैशापेक्षा कमी व ६७ पैश्यापेक्षा जास्त असे दुष्काळजन्य स्थितीचे निकष ठरले आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६७ पैशांच्या आत असल्याने सोयी-सवलती मिळणार आहेत. अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागाची नजरअंदाज पैसेवारी ही दरवर्षी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येत असते. परंतु यंदा या तीनही विभागांसह राज्यात असणारी दुष्काळसदृश जाहीर करण्याच्या अनुषंगाने चालू हंगामात ३० सप्टेंबर ऐवजी १५ सप्टेंबर तारीख समजून तीनही विभागाची नजरअंदाज पैसेवारी तत्काळ जाहीर करावी, असे महसूल विभागाचे उपसचिव मंदार पोहोरे यांनी १५ सप्टेंबरला विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते. या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी १६ सप्टेंबरला शासनाने पैसेवारी काढण्याची सुधारित पद्धत जाहीर केली. या आदेशान्वये मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशाच्या कमी व जास्त असे पैसेवारी आलेली गावे घोषित करावी, असे आदेश शासनाने दिलेत. सर्व विभागाची पैसेवारी एकाच वेळीराज्यातील कोकण, पुणे व नाशीक विभागाची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला जाहीर करण्यात येते व औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाची ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येत असते. किंबहुना राज्यातील दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करण्याच्या अनुषंगाने शासनाने सर्व विभागांची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला एकाच वेळी जाहीर करण्याच्या अनुषंगाने १५ सप्टेंबरला हा निर्णय घेतला. पैसेवारीच्या ५० पैशाचे निकष बदललेशासनाने ४ मार्च १९८९ चे ठरावानुसार लगतच्या मागील १० वर्षांच्या कालावधीत ३ उत्तम उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण समजून ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांना सोयीसवलती देण्यात येतात. मात्र शासनाने १६ सप्टेंबर रोजी पैसेवारीचे प्रचलित निकष बदलविले, या नव्या निकषानुसार मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशांपेक्षा कमी व ६७ पैश्यापेक्षा जास्त असे पैसेवारीचे निकष ठरविण्यात आलेले आहेत. केंद्राला करणार मदतीची मागणीजून महिन्यात पेरणीपासून पावसाची दडी व त्यानंतर पुन्हा पावसाची प्रदीर्घ दडी यामुळे राज्यात एकाही जिल्ह्याने पावसाची अपेक्षित सरासरी पार केलेली नाही. राज्यात दुष्काळसदृष्य स्थिती आहे व ही दुष्काळ स्थिती जाहीर करून केंद्र शासनाकडून मदतीची ज्ञापन पाठविण्यात येणार आहे.