शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कंपोस्ट डेपो? छे ! कचºयाचा डोंगरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:31 IST

आठ लाख लोकसंख्येच्या अंबानगरीतील हजारो टन कचरा वर्षानुवर्षे नजीकच्या सुुकळी येथील कंपोस्ट डेपोत ‘डम्प’ करण्यात येत असल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

ठळक मुद्देसुकळी प्रकल्पाचे वास्तव : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आत्यंतिक निकड

अमरावती : आठ लाख लोकसंख्येच्या अंबानगरीतील हजारो टन कचरा वर्षानुवर्षे नजीकच्या सुुकळी येथील कंपोस्ट डेपोत ‘डम्प’ करण्यात येत असल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सुकळी गावाचे आरोग्य या कंपोस्ट डेपोमुळे धोक्यात आले आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी अत्यंत निकडीची आहे.या कंपोस्ट डेपोत सुमारे ७ ते ८ लाख टन कचरा विनाप्रक्रिया पडला असून त्यात शहरातून निघणाºया दैनंदिन २०० टन कचºयाची भर पडत आहे. येथे कचरा साठविण्याची मर्यादा १०-१२ वर्षांपूर्वीच संपुष्टात आली असून आता त्याठिकाणी कचरा साठविण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने कचरा समस्येचा स्फोट होण्याची भीती आहे.महापालिका अस्तिवात येण्यापूर्वीच कचरा शहराबाहेर साठविण्यासाठी सुकळी येथील जागेचे आरक्षण कंपोस्ट डेपोसाठी करण्यात आले. तूर्तास या ठिकाणची ९.३८ हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. नगरपालिकेच्या काळापासून सुकळी येथे महापालिका हद्दीतून दैनंदिन निघणारा घनकचरा साठविला जातो. त्या घनकचºयावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने तेथे डोंगरसदृष्य परिस्थिती आहे. शहरात अन्य ठिकाणी कंपोस्ट डेपोचे आरक्षण असताना तेथे कचरा साठवणूक होत नसल्याने सुकळीत ७ ते ८ लाख टन कचरा साठविण्यात आल्याने हा प्रकल्प केव्हाचाच ओव्हरफ्लो झाला आहे. कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने या भागातील ‘डीपी रोडलाही कचºयाने कवेत घेतले आहे. दुसरीकडे कचºयाचा डोंगर साचल्याने सुकळीसह लसनापूर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात या भागाची परिस्थिती हाताबाहेर जाते. नेहमीप्रमाणे याही पावसाळ्यात कचरा डेपोत कचरा डम्प करण्यासाठी साधा पोकलॅण्ड देण्याची सवड प्रशासनाला मिळाली नाही. कचºयाचा ५० ते ६० फूट उंचीचा थर लागल्याने कचरा वाहतूकदारांचे ट्रक कचºयाच्या डोंगरावर चढविणे शक्य नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत येथील कचरा समस्येचा स्फोट झाल्यास आश्चर्य वाटू नये, अशी विद्यमान स्थिती आहे.तो प्रकल्प बंदचसुकळी येथील कंपोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला. कचºयातील प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प गाजावाजा करुन उभारण्यात आला. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटचे कार्यान्वयन होते. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे उदासीन धोरण व त्यात महावितरणने घातलेला खोडा या प्रकल्पाच्या मुळावर उठला. २ आॅक्टोबर २०१६ ला उद्घाटन झालेला हा प्रकल्प वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे कंपोस्ट डेपोतील कचरा समस्या अधिक ज्वलंत झाली आहे.