शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

महाविद्यालयस्तरीय प्राध्यापक ‘समन्वयक’ गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST

अमरावती : कोणत्याही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठात येऊ नये, यासाठी महाविद्यालय स्तरावर प्राध्यापकांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्तीचा निर्णय संत ...

अमरावती : कोणत्याही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठात येऊ नये, यासाठी महाविद्यालय

स्तरावर प्राध्यापकांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्तीचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून घेण्यात आला. मात्र, या उपक्रमाला महाविद्यालयांनी योग्य प्रतिसाद दिला नाही.

अखेर तीन वर्षांतच हा उपक्रम गुंडाळावा लागला, समन्वयक पद कायम असते तर हल्ली ‘विथहेल्ड’ निकालासाठी विद्यार्थ्यांची होत असलेली गर्दी रोखता आली असती, असे बोलले जात आहे.

गाव, खेड्यांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती, प्रवेश अथवा पदवी संदर्भात विद्यापीठात येण्याची गरज पडू नये, यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी एका प्राध्यापकांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय विद्यापीठाने अधिसूचना क्रमांक १४१/२०१५ अन्वये घेतला.

त्याकरिता संबंधित प्राध्यापकाला वर्षाकाठी पाच हजार रुपये मानधन देण्यात आले. या उपक्रमाची निदेश क्रमांक २९ सप्टेंबर २०१५ नुसार अंमलबजावणी सुरू झाली. सन २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत महाविद्यालयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. विद्यापीठ अंतर्गत ४१० पैकी २६६ महाविद्यालयांनीच प्राध्यापकांची ‘समन्वयक’पदी नियुक्ती केली होती. प्राचार्यांच्या कार्यपूर्ती अहवालाच्या आधारे विद्यापीठाने प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे मानधनदेखील अदा केले आहे. परंतु, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे महाविद्यालय स्तरावर होण्याऐवजी स्वत: विद्यार्थी विद्यापीठात येत होते. ज्या हेतुने प्राध्यापकांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली तो हेतू साध्य होत नसल्याने १४ मे २०१९ रोजी व्यवस्थापन समितीने हा उपक्रम गुंडाळण्याचा निर्णय घेतला.

--------------------

कार्यपूर्ती अहवालाच्या आधारे प्राध्यापक नियुक्त ‘समन्वयक’ यांना वर्षाचे पाच हजार रुपये मानधन देण्यात आले. मात्र, या उपक्रमाचा फारसा लाभ झाला नाही. जी कामे प्राध्यापकांनी करणे अपेक्षित होते, ती कामे स्वत: विद्यार्थी विद्यापीठात घेऊन यायचे. त्यामुळे हा उपक्रम बंद करण्यात आला.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

-------------------------

विद्यार्थी हिताकडे महाविद्यालयांचे दुर्लक्ष

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठात येऊ नये, हा उपक्रम अतिशय चांगला होता. मात्र, कॉलेज स्तरावर विद्यार्थी हिताकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, हे यावरून स्पष्ट होते. सोमवारपासून ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी १०० ते १५० कि.मी. अंतर ओलांडून विद्यार्थी विद्यापीठ गाठत आहे. आज प्राध्यापक समन्वयक असते तर हा प्रश्न ते सोडवू शकले असते, अशा विद्यार्थ्यांच्या सूचक प्रतिक्रिया आहेत.