शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

कोकणची पिठलं-भाकरी अमरावतीत

By admin | Updated: June 12, 2015 00:40 IST

तळेघरच्या महिला बचत गटाचे यश

अमरावती - कोकण महोत्सवात नाचणीची भाकरी व कुळथाचे पिठले जेव्हा पन्नास रूपयाला विकले गेले तेव्हा या महोत्सवात सहभागी झालेल्या मंडणगड तालुक्यातील तळेघर येथील भूमिकन्या कृषी बचत गटातील महिलांना आश्चर्य वाटेल नाही तरच नवल.केवळ चार दिवसात २० हजार रुपयांची विक्री झाली. मंडणगड तालुक्यातील १५० लोकवस्तीचे तळेघर हे छोटेसे गाव. तळेघर ते अमरावती हा प्रवास किमान ५०० ते ६०० किलोमीटर्सचा प्रवास त्यांनी केला. आयुष्यात प्रथमच १३ दिवस घर सोडण्याचा टिपीकल कोकणी बाईच्या आयुष्यातील हा विक्रमच म्हणावा लागेल. अमरावती येथे कोकणी महोत्सवानिमित्त मंडणगड येथील बचत गटाने सहभाग घेतला. दापोली येथील अनिश पटवर्धन यांच्या सोबत तळेघर येथील भूमिकन्या शेतकरी महिला बचत गटातील दोन महिला अर्चना गणपत करावडे, अरूणा सीताराम पारदुले, कॉलेजमधील चार विद्यार्थी सुप्रिया माने, अजय पारदुले, सुमित करावडे व सुजाता म्हसकर या दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. पाच दिवस अमरावती व पाच दिवस नागपूरला कोकणातल्या सर्व पदार्र्थांचा स्टॉल त्यांनी मांडला होता. अमरावती व नागपूरकरांचा त्याला भरभरून प्रतिसाद लाभला. विदर्भ व कोकण सर्वांगाने भिन्न, त्यामुळे वैदर्भीय लोकांना कोकणातील पदार्थांचे विलक्षण आकर्षण आहे. तळेघरचा हा ग्रुप या तेरा दिवसात खूप काही शिकला. मालाची उचलपाचल, मालाची विक्री ग्राहकांशी संवाद, रोजचा हिशोब, नफा-तोट्याचे गणित आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या कोकणतील आपल्याच पदार्थांचे महत्व त्यांना समजले.विदर्भातल्या ४७ अंश सेल्सिअस वातावरणात कोकणातील गारवा आठवू लागला. आपण करत असलेले काम यावर चर्चाविनिमय होऊ लागल्या. यातूनच नवीन उर्मी निर्माण झाली. गाव आणि तालुक्याबाहेर आपल्या उत्पादनांना लोक एवढे पसंत करतात, हे प्रथमच या महिलांना जाणवले. या दौऱ्यानंतर आणखी काय करायला हवे, याचे नियोजन करण्यास सुरूवात झाली. एकूणच भूमिकन्या कृषी महिला बचत गटातील महिलांना अमरावती - कोकण महोत्सव प्रेरणदायी ठरला. विदर्भातील अमरावती, नागपूर येथे कोकणातील एक बचत गट जातो आणि तेथे कोकणी उत्पादनांचा स्टॉल लावतो, हे सारे येथील महिलांना आनंददायी तर आहेच, पण नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या बचतगटांसाठी वेगळा पॅटर्न ठरणारा आहे. - प्रशांत सुर्वेतळेघरच्या महिला बचत गटाचे यशमुंबई, पुण्यात कोकण महोत्सव होतात, हे येथील महिलांना ठाऊक होते. मात्र, विदर्भात अमरावती येथे प्रथमच मंडणगड तालुक्यातील तळेघर येथील भूमिकन्या बचत गटाने आपले स्टॉल मांडले. अमरावती येथील या स्टॉल्सना अनेकांनी भेट दिली. स्टॉलला भेट देणाऱ्यांनी कोकणी उत्पादनांना अक्षरश: डोक्यावर घेतले. असा प्रयोग सतत झाल्यास कोकणातील आंबा, काजूबरोबरच पदार्थाना मागणी वाढेल हे नक्की.