शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

कोकणची पिठलं-भाकरी अमरावतीत

By admin | Updated: June 12, 2015 00:40 IST

तळेघरच्या महिला बचत गटाचे यश

अमरावती - कोकण महोत्सवात नाचणीची भाकरी व कुळथाचे पिठले जेव्हा पन्नास रूपयाला विकले गेले तेव्हा या महोत्सवात सहभागी झालेल्या मंडणगड तालुक्यातील तळेघर येथील भूमिकन्या कृषी बचत गटातील महिलांना आश्चर्य वाटेल नाही तरच नवल.केवळ चार दिवसात २० हजार रुपयांची विक्री झाली. मंडणगड तालुक्यातील १५० लोकवस्तीचे तळेघर हे छोटेसे गाव. तळेघर ते अमरावती हा प्रवास किमान ५०० ते ६०० किलोमीटर्सचा प्रवास त्यांनी केला. आयुष्यात प्रथमच १३ दिवस घर सोडण्याचा टिपीकल कोकणी बाईच्या आयुष्यातील हा विक्रमच म्हणावा लागेल. अमरावती येथे कोकणी महोत्सवानिमित्त मंडणगड येथील बचत गटाने सहभाग घेतला. दापोली येथील अनिश पटवर्धन यांच्या सोबत तळेघर येथील भूमिकन्या शेतकरी महिला बचत गटातील दोन महिला अर्चना गणपत करावडे, अरूणा सीताराम पारदुले, कॉलेजमधील चार विद्यार्थी सुप्रिया माने, अजय पारदुले, सुमित करावडे व सुजाता म्हसकर या दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. पाच दिवस अमरावती व पाच दिवस नागपूरला कोकणातल्या सर्व पदार्र्थांचा स्टॉल त्यांनी मांडला होता. अमरावती व नागपूरकरांचा त्याला भरभरून प्रतिसाद लाभला. विदर्भ व कोकण सर्वांगाने भिन्न, त्यामुळे वैदर्भीय लोकांना कोकणातील पदार्थांचे विलक्षण आकर्षण आहे. तळेघरचा हा ग्रुप या तेरा दिवसात खूप काही शिकला. मालाची उचलपाचल, मालाची विक्री ग्राहकांशी संवाद, रोजचा हिशोब, नफा-तोट्याचे गणित आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या कोकणतील आपल्याच पदार्थांचे महत्व त्यांना समजले.विदर्भातल्या ४७ अंश सेल्सिअस वातावरणात कोकणातील गारवा आठवू लागला. आपण करत असलेले काम यावर चर्चाविनिमय होऊ लागल्या. यातूनच नवीन उर्मी निर्माण झाली. गाव आणि तालुक्याबाहेर आपल्या उत्पादनांना लोक एवढे पसंत करतात, हे प्रथमच या महिलांना जाणवले. या दौऱ्यानंतर आणखी काय करायला हवे, याचे नियोजन करण्यास सुरूवात झाली. एकूणच भूमिकन्या कृषी महिला बचत गटातील महिलांना अमरावती - कोकण महोत्सव प्रेरणदायी ठरला. विदर्भातील अमरावती, नागपूर येथे कोकणातील एक बचत गट जातो आणि तेथे कोकणी उत्पादनांचा स्टॉल लावतो, हे सारे येथील महिलांना आनंददायी तर आहेच, पण नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या बचतगटांसाठी वेगळा पॅटर्न ठरणारा आहे. - प्रशांत सुर्वेतळेघरच्या महिला बचत गटाचे यशमुंबई, पुण्यात कोकण महोत्सव होतात, हे येथील महिलांना ठाऊक होते. मात्र, विदर्भात अमरावती येथे प्रथमच मंडणगड तालुक्यातील तळेघर येथील भूमिकन्या बचत गटाने आपले स्टॉल मांडले. अमरावती येथील या स्टॉल्सना अनेकांनी भेट दिली. स्टॉलला भेट देणाऱ्यांनी कोकणी उत्पादनांना अक्षरश: डोक्यावर घेतले. असा प्रयोग सतत झाल्यास कोकणातील आंबा, काजूबरोबरच पदार्थाना मागणी वाढेल हे नक्की.